शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी आरक्षणाच्या मंजुरीची अट वगळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 13:41 IST

जलसंपदा विभागाची पाणी आरक्षणाची मंजुरी यापूर्वी आवश्यक होती. आता सदर मंजुरी आवश्यक राहणार नाही, असा आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ८ आॅगस्ट रोजी दिल्याने यावर्षीच्या हिवाळ्यापासून याचा लाभ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना मिळणार आहे.

वाशिम : ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या जलसाठ्यांचे स्रोत म्हणून वापर करावयाचा असल्यास, त्यासाठी जलसंपदा विभागाची पाणी आरक्षणाची मंजुरी यापूर्वी आवश्यक होती. आता सदर मंजुरी आवश्यक राहणार नाही, असा आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ८ आॅगस्ट रोजी दिल्याने यावर्षीच्या हिवाळ्यापासून याचा लाभ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना मिळणार आहे.ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलसाठ्यांचे स्रोत म्हणून वापर करावयाचा असल्यास, त्याकरिता जलसंपदा विभागाकडील पाणी आरक्षणाच्या मंजुरीची आवश्यकता होती. त्यामुळे काही वेळेला अडचणी निर्माण होत होत्या. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलसाठ्यांचे स्रोत म्हणून वापर करावयाचा असल्यास, त्याकरिता जलसंपदा विभागाकडील पाणी आरक्षणाच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या १६ मे २०१७ च्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने १६ सप्टेंबर २०१७ रोजी शासन निर्णयही पारित करण्यात आला. सदर निर्णयातील तरतुदी या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातील ज्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबविल्या जातात, केवळ अशाच योजनांना लागू आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जलस्वराज्य २, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदांमार्फत घेण्यात येणारे प्रकल्प तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येणाºया नळ पाणी पुरवठा योजनांसाठीदेखील पाणी आरक्षणाच्या पूर्वसंमतीची आवश्यक नसावी, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या १९ जुलै २०१८ रोजीच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयास अनुसरून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येणाºया राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलस्वराज्य व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाकरिता जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलसाठ्यांचा स्रोत म्हणून वापर करावयाचा असल्यास, त्याकरिता जलसंपदा विभागाकडील पाणी आरक्षणाच्या पूर्वमंजुरीची आवश्यकता राहणार नाही, असा निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ८ आॅगस्ट रोजी घेतला असून, तशा सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या हिवाळ्यापासूनच केली जाणार आहे. जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येणाºया नळ पाणी पुरवठा योजनांसंदर्भातील शासन निर्णयाची माहिती जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा, ग्रामपंचायतींना दिली जात आहे, असे वाशिम येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांनी सांगितले.

 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी