शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी आरक्षणाच्या मंजुरीची अट वगळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 13:41 IST

जलसंपदा विभागाची पाणी आरक्षणाची मंजुरी यापूर्वी आवश्यक होती. आता सदर मंजुरी आवश्यक राहणार नाही, असा आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ८ आॅगस्ट रोजी दिल्याने यावर्षीच्या हिवाळ्यापासून याचा लाभ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना मिळणार आहे.

वाशिम : ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या जलसाठ्यांचे स्रोत म्हणून वापर करावयाचा असल्यास, त्यासाठी जलसंपदा विभागाची पाणी आरक्षणाची मंजुरी यापूर्वी आवश्यक होती. आता सदर मंजुरी आवश्यक राहणार नाही, असा आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ८ आॅगस्ट रोजी दिल्याने यावर्षीच्या हिवाळ्यापासून याचा लाभ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांना मिळणार आहे.ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलसाठ्यांचे स्रोत म्हणून वापर करावयाचा असल्यास, त्याकरिता जलसंपदा विभागाकडील पाणी आरक्षणाच्या मंजुरीची आवश्यकता होती. त्यामुळे काही वेळेला अडचणी निर्माण होत होत्या. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांसाठी जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलसाठ्यांचे स्रोत म्हणून वापर करावयाचा असल्यास, त्याकरिता जलसंपदा विभागाकडील पाणी आरक्षणाच्या मंजुरीची आवश्यकता राहणार नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या १६ मे २०१७ च्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने १६ सप्टेंबर २०१७ रोजी शासन निर्णयही पारित करण्यात आला. सदर निर्णयातील तरतुदी या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातील ज्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत राबविल्या जातात, केवळ अशाच योजनांना लागू आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जलस्वराज्य २, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदांमार्फत घेण्यात येणारे प्रकल्प तसेच मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येणाºया नळ पाणी पुरवठा योजनांसाठीदेखील पाणी आरक्षणाच्या पूर्वसंमतीची आवश्यक नसावी, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या १९ जुलै २०१८ रोजीच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयास अनुसरून पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येणाºया राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलस्वराज्य व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाकरिता जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलसाठ्यांचा स्रोत म्हणून वापर करावयाचा असल्यास, त्याकरिता जलसंपदा विभागाकडील पाणी आरक्षणाच्या पूर्वमंजुरीची आवश्यकता राहणार नाही, असा निर्णय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ८ आॅगस्ट रोजी घेतला असून, तशा सूचना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या हिवाळ्यापासूनच केली जाणार आहे. जिल्हा परिषदांमार्फत राबविण्यात येणाºया नळ पाणी पुरवठा योजनांसंदर्भातील शासन निर्णयाची माहिती जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा, ग्रामपंचायतींना दिली जात आहे, असे वाशिम येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांनी सांगितले.

 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी