शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

‘एकबूर्जी’ प्रकल्पाच्या जलसाठ्यात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 15:08 IST

वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबूर्जी या मध्यम जलाशयाच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, २१ फेबू्रवारीला या प्रकल्पात केवळ २५ टक्केच पाणी शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबूर्जी या मध्यम जलाशयाच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, २१ फेबू्रवारीला या प्रकल्पात केवळ २५ टक्केच पाणी शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले. असे असतानाही मोटारपंपांव्दारे उपसा सिंचन सुरूच असल्याने भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.वाशिमच्या एकबुर्जी सिंचन प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी १५१.९४ मीटरची असून ११.९७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या प्रकल्पात होतो. मात्र, योग्य नियोजनाअभावी सद्य:स्थितीत उपयुक्त जलसाठा केवळ ३.५० दशलक्ष घनमीटर अर्थात एकूण क्षमतेच्या केवळ २५ टक्केच साठा असून शहराला होणारा पाणीपुरवठा आणि उपसा पद्धतीने सिंचनाचे योग्य नियोजन न केल्यास तोंडावर असलेल्या उन्हाळ्यात वाशिमकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेन, असा जाणकारांचा अंदाज आहे. याकडे जलसंपदा विभाग, नगर परिषद प्रशासनाने लक्ष पुरवून योग्य नियोजन करावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे. (प्रतिनिधी)

 

रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एकबुर्जी सिंचन प्रकल्पातून उपसा पद्धतीने सिंचनाची परवानगी देण्यात आली होती. आता मात्र, संबंधित शेतकºयांनी त्यांचे मोटारपंप काढून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येईल.- प्रशांत बोरसेकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प