शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

शेतक-यांना सिंचनासाठी मिळणार पाणी

By admin | Updated: November 12, 2014 23:22 IST

पाणी आरक्षण समितीची बैठक; पाणी सोडण्याचे वाशिम जिल्हाधिकारी कुळकर्णी यांचे आदेश.

वाशिम : जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यंदाच्या रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी आरक्षित पाणीसाठी वगळून शिल्लक राहणारे पाणी सिंचनासाठीन सोडण्याच आदेश संबधित यंत्रणेला दिले आहेत. बिगर सिंचन संस्थांच्या मागणीनुसार पाणी आरक्षित करण्यासाठी पाणी आरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी सिंचनासाठी पाणी सोडण्याचे आदेश देऊन दुष्काळाने होर पळणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज. स. शिंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप कार्यकारी अभियंता एन. एम. राठोड, रिसोड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अधिकारी डी. एन. इंगोले, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, मंगरूळपीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वि. ब. दातार यांच्यासह पाणी पुरवठा व पाठबंधारे विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील धरणे व बंधार्‍यामध्ये उपलब्ध असलेल्या उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली.तसेच उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी आवश्यक पाणीसाठा याचीही माहिती यावेळी जिल्ह्याधिका-यांनी घेतली. बिगर सिंचन पाणी वापर संस्थांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार यावेळी जिल्ह्यातील उपलब्ध पाणी आरक्षित करण्यात आले. आरक्षित केलेल्या पाण्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेले पाणी शेतीसाठी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी यावेळी दिले.जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. याबाबत लाभधारकांनी संबंधित सिंचन शाखा कार्यालयांशी संपर्क साधून सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्याची माहिती घ्यावी. तसेच आपल्याकडील थकबाकी भरून पाणी मागणी अर्ज करावा, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.