शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

महामार्गांच्या कामातून वाशिम जिल्ह्यात जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:26 IST

शासकीय आणि खासगी जमिनींवर भव्य आकाराच्या १०९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह समृद्धी मार्गाच्या कामांसाठी गौणखनिजांची पूर्तता करण्यासाठी शासकीय आणि खासगी जमिनींवर भव्य आकाराच्या १०९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली. या तळ्यांमुळे कोट्यवधी लिटरचा जलसाठा तयार होऊन जिल्ह्यात जलसमृद्धीच झाल्याचे स्पष्ट होत आहे.महामार्गांच्या कामातील गौणखनिजाची पूर्तता करताना जलसंधारणाची कामेही व्हावीत, असे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार ज्या ग्रामपंचायती व शेतकऱ्यांनी ठराव किंवा प्रस्ताव दिले. त्या ठिकाणाची पाहणी कृषि विभागामार्फत करण्यात आली व त्याठिकाणी उपलब्ध पाणलोट क्षेत्राचा विचार करून शेततळ्यांचा आकार ठरविण्यात आला. त्याची अंदाजपत्रके व प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले व जिल्हास्तर समितीची मान्यता, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासकीय आदेश आल्यानंतर शेतकरी, ग्रामपंचायत व संबधित कंत्राटदार तसेच तालुका कृषी अधिकाºयांदरम्यान नोंदणीकृत करार करून एकूण ११९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली.

कारंजा तालुक्यात ९० तळ्यांची कामे !कारंजा तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून १५८ साठवण शिवार तळ्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० तळ्यांची कामे पूर्ण झाली असून, १२ तळ्यांची कामे सुरू आहेत. पावसाळा असल्याने तळ्यांची कामे थांबली असून, पावसाळा संपताच सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी सांगितले.

शासनाचा एक पैसाही न खर्च होता कोटींची कामेमहामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात सहा तालुक्यात मिळून ५० मीटर रूंद आणि ७० मीटर लांब, ३ मीटर खोल, तसेच १०० मीटर रूंद, १०० मीटर लांब आणि ३ मीटर खोल अशा भव्य आकाराची कोट्यवधी खर्च येणाºया १०९ तळ्यांची कामे शासनाचा एक पैसाही न करता पूर्ण झाली.

४९६ कोटी लिटर जलसाठा४जिल्ह्यात समृद्धी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी जी शिवार तळे खोदण्यात आली. वर्षभरात हे तळे भरल्यास तब्बल ४९६ कोटी लिटरचा जलसाठा उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत यातील ९० पेक्षा अधिक तळे पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली असून, तळ्यातील पाण्याचा शेतकºयांना फायदा होणार आहे.

समृद्धी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या १०९ साठवण तळ्यांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. शिवाय कोट्यवधी लिटरचा जलसाठाही निर्माण झाला असून, लाखो ब्रास गौणखनिजाची पूर्तताही होऊ शकली आहे.- एस. एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी