शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
Radhika Yadav : "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
3
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
4
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
5
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
6
परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग
7
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
8
Diwali 2025: या दिवाळीत स्वतःला द्या एक छोटासा ब्रेक; तुमचे टॅरो कार्ड काय सांगते पहा!
9
भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले
10
अरे देवा! भांडी घासताना काचेच्या ग्लासमध्ये अडकला हात, सर्जरीनंतरच झाली सुटका
11
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
12
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
13
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
14
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
15
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
16
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
17
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
18
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
19
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
20
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!

महामार्गांच्या कामातून वाशिम जिल्ह्यात जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:26 IST

शासकीय आणि खासगी जमिनींवर भव्य आकाराच्या १०९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह समृद्धी मार्गाच्या कामांसाठी गौणखनिजांची पूर्तता करण्यासाठी शासकीय आणि खासगी जमिनींवर भव्य आकाराच्या १०९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली. या तळ्यांमुळे कोट्यवधी लिटरचा जलसाठा तयार होऊन जिल्ह्यात जलसमृद्धीच झाल्याचे स्पष्ट होत आहे.महामार्गांच्या कामातील गौणखनिजाची पूर्तता करताना जलसंधारणाची कामेही व्हावीत, असे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार ज्या ग्रामपंचायती व शेतकऱ्यांनी ठराव किंवा प्रस्ताव दिले. त्या ठिकाणाची पाहणी कृषि विभागामार्फत करण्यात आली व त्याठिकाणी उपलब्ध पाणलोट क्षेत्राचा विचार करून शेततळ्यांचा आकार ठरविण्यात आला. त्याची अंदाजपत्रके व प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले व जिल्हास्तर समितीची मान्यता, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासकीय आदेश आल्यानंतर शेतकरी, ग्रामपंचायत व संबधित कंत्राटदार तसेच तालुका कृषी अधिकाºयांदरम्यान नोंदणीकृत करार करून एकूण ११९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली.

कारंजा तालुक्यात ९० तळ्यांची कामे !कारंजा तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून १५८ साठवण शिवार तळ्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० तळ्यांची कामे पूर्ण झाली असून, १२ तळ्यांची कामे सुरू आहेत. पावसाळा असल्याने तळ्यांची कामे थांबली असून, पावसाळा संपताच सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी सांगितले.

शासनाचा एक पैसाही न खर्च होता कोटींची कामेमहामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात सहा तालुक्यात मिळून ५० मीटर रूंद आणि ७० मीटर लांब, ३ मीटर खोल, तसेच १०० मीटर रूंद, १०० मीटर लांब आणि ३ मीटर खोल अशा भव्य आकाराची कोट्यवधी खर्च येणाºया १०९ तळ्यांची कामे शासनाचा एक पैसाही न करता पूर्ण झाली.

४९६ कोटी लिटर जलसाठा४जिल्ह्यात समृद्धी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी जी शिवार तळे खोदण्यात आली. वर्षभरात हे तळे भरल्यास तब्बल ४९६ कोटी लिटरचा जलसाठा उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत यातील ९० पेक्षा अधिक तळे पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली असून, तळ्यातील पाण्याचा शेतकºयांना फायदा होणार आहे.

समृद्धी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या १०९ साठवण तळ्यांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. शिवाय कोट्यवधी लिटरचा जलसाठाही निर्माण झाला असून, लाखो ब्रास गौणखनिजाची पूर्तताही होऊ शकली आहे.- एस. एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी