शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गांच्या कामातून वाशिम जिल्ह्यात जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:26 IST

शासकीय आणि खासगी जमिनींवर भव्य आकाराच्या १०९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली.

- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह समृद्धी मार्गाच्या कामांसाठी गौणखनिजांची पूर्तता करण्यासाठी शासकीय आणि खासगी जमिनींवर भव्य आकाराच्या १०९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली. या तळ्यांमुळे कोट्यवधी लिटरचा जलसाठा तयार होऊन जिल्ह्यात जलसमृद्धीच झाल्याचे स्पष्ट होत आहे.महामार्गांच्या कामातील गौणखनिजाची पूर्तता करताना जलसंधारणाची कामेही व्हावीत, असे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार ज्या ग्रामपंचायती व शेतकऱ्यांनी ठराव किंवा प्रस्ताव दिले. त्या ठिकाणाची पाहणी कृषि विभागामार्फत करण्यात आली व त्याठिकाणी उपलब्ध पाणलोट क्षेत्राचा विचार करून शेततळ्यांचा आकार ठरविण्यात आला. त्याची अंदाजपत्रके व प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले व जिल्हास्तर समितीची मान्यता, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासकीय आदेश आल्यानंतर शेतकरी, ग्रामपंचायत व संबधित कंत्राटदार तसेच तालुका कृषी अधिकाºयांदरम्यान नोंदणीकृत करार करून एकूण ११९ शिवार तळ्यांची कामे करण्यात आली.

कारंजा तालुक्यात ९० तळ्यांची कामे !कारंजा तालुक्यात समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून १५८ साठवण शिवार तळ्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी ९० तळ्यांची कामे पूर्ण झाली असून, १२ तळ्यांची कामे सुरू आहेत. पावसाळा असल्याने तळ्यांची कामे थांबली असून, पावसाळा संपताच सर्व कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी सांगितले.

शासनाचा एक पैसाही न खर्च होता कोटींची कामेमहामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यात सहा तालुक्यात मिळून ५० मीटर रूंद आणि ७० मीटर लांब, ३ मीटर खोल, तसेच १०० मीटर रूंद, १०० मीटर लांब आणि ३ मीटर खोल अशा भव्य आकाराची कोट्यवधी खर्च येणाºया १०९ तळ्यांची कामे शासनाचा एक पैसाही न करता पूर्ण झाली.

४९६ कोटी लिटर जलसाठा४जिल्ह्यात समृद्धी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी जी शिवार तळे खोदण्यात आली. वर्षभरात हे तळे भरल्यास तब्बल ४९६ कोटी लिटरचा जलसाठा उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत यातील ९० पेक्षा अधिक तळे पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरातील भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली असून, तळ्यातील पाण्याचा शेतकºयांना फायदा होणार आहे.

समृद्धी आणि राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या १०९ साठवण तळ्यांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. शिवाय कोट्यवधी लिटरचा जलसाठाही निर्माण झाला असून, लाखो ब्रास गौणखनिजाची पूर्तताही होऊ शकली आहे.- एस. एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी