शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा प्रशासनाचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार; पण अंमलबजावणी शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 19:32 IST

वाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात ३० ते ४५ टक्के घट झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला आहे. यासंदर्भात गत महिन्यात ४.४८ कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडाही जाहीर झाला; परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस अद्याप सुरूवात झालेली नाही. 

ठळक मुद्देग्रामीण भागात उद्भवली पाणीटंचाईविहिरींची पाणीपातळीही खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात ३० ते ४५ टक्के घट झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला आहे. यासंदर्भात गत महिन्यात ४.४८ कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडाही जाहीर झाला; परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस अद्याप सुरूवात झालेली नाही. यावर्षी ५१० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार असून त्यादृष्टीने वाशिम जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील ४९१ विहिरींचे अधिग्रहण आणि ७४ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची बाब प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर जलस्त्रातोंप्रमाणेच विहिरींची पाणीपातळीही कमालीची खालावल्याने प्रशासन ४९१ विहिरींमधील पाणी कसे उपलब्ध करणार, हा गहण प्रश्न सद्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने जनजीवन हैराण झाले असून जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. पुरेसे पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचा पेराही घटला असून अशा स्थितीत पाणीटंचाई कृती आराखड्यातील तरतुदीनुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करताना जिल्हा प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी