शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

वाशिम जिल्हा प्रशासनाचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार; पण अंमलबजावणी शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 19:32 IST

वाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात ३० ते ४५ टक्के घट झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला आहे. यासंदर्भात गत महिन्यात ४.४८ कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडाही जाहीर झाला; परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस अद्याप सुरूवात झालेली नाही. 

ठळक मुद्देग्रामीण भागात उद्भवली पाणीटंचाईविहिरींची पाणीपातळीही खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात ३० ते ४५ टक्के घट झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला आहे. यासंदर्भात गत महिन्यात ४.४८ कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडाही जाहीर झाला; परंतु त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस अद्याप सुरूवात झालेली नाही. यावर्षी ५१० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार असून त्यादृष्टीने वाशिम जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील ४९१ विहिरींचे अधिग्रहण आणि ७४ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची बाब प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर जलस्त्रातोंप्रमाणेच विहिरींची पाणीपातळीही कमालीची खालावल्याने प्रशासन ४९१ विहिरींमधील पाणी कसे उपलब्ध करणार, हा गहण प्रश्न सद्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागल्याने जनजीवन हैराण झाले असून जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. पुरेसे पाणी नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचा पेराही घटला असून अशा स्थितीत पाणीटंचाई कृती आराखड्यातील तरतुदीनुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करताना जिल्हा प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी