शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ाचा पाणीटंचाई कृती आराखडा जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:24 IST

दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच जिल्हय़ात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत असून, एरव्ही जानेवारी महिन्यात जाहीर होणारा पाणीटंचाई कृती आराखडा यंदा मात्र डिसेंबरमध्येच जाहीर झाला आहे. ५१0 गावांच्या या आराखडयात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या असून, त्यावर ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देपाणीटंचाईची झळ ५१0 गावात ५७८ उपाययोजनांवर ४.४८ कोटींची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच वाशिम जिल्हय़ात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत असून, एरव्ही जानेवारी महिन्यात जाहीर होणारा पाणीटंचाई कृती आराखडा यंदा मात्र डिसेंबरमध्येच जाहीर झाला आहे. ५१0 गावांच्या या आराखडयात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या असून, त्यावर ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.जिल्ह्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी कृती आराखडा तयार करून उपाययोजना आखल्या जातात. दरम्यान, २0१७ मधील कृती आराखडा चालू वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जाहीर झाला होता. २५२ गावांमध्ये करावयाच्या २५२ उपाययोजनांसाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा मात्र डिसेंबरमध्येच प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजनांची आखणी केली असून, त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. 

जिल्हय़ात मंगरूळपीर तालुका ‘डेंजर झोन’मध्येजिल्हय़ातील इतर तालुक्यांच्या तुलनेत यंदा मंगरूळपीर तालुका पाणीटंचाईच्या बाबतीत ‘डेंजर झोन’मध्ये आहे. या तालुक्यातील १५ लघुप्रकल्पांमध्ये आजमितीस केवह १0.५0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ मालेगाव तालुक्याचा क्रमांक लागत असून, या तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पात केवळ ३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, २१ लघुप्रकल्पांमध्ये १२ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पाणीटंचाई कृती आराखड्यातही या तालुक्यांना झुकते माप देण्यात आले.

४९१ विहिरींचे होणार अधिग्रहण!पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्हय़ातील ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून, त्याद्वारे पाणी पुरविण्यात येईल.

वाशिम शहरात होतोय दहा दिवसाआड पाणीपुरवठाएकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ ३ दलघमी पाणी शिल्लक आहे. ते आगामी किमान सहा महिने पुरवावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणी कपातीचे धोरण अंगीकारण्यात आले असून, शहराला सध्या आठ ते दहा दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे.

७४ गावांमध्ये टँकरने होणार पाणीपुरवठाजिल्हय़ातील पाणीटंचाईग्रस्त ५१0 गावांपैकी ७४ गावांना टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. - 

टॅग्स :washimवाशिमwater transportजलवाहतूक