शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

वाशिम जिल्हय़ाचा पाणीटंचाई कृती आराखडा जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:24 IST

दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच जिल्हय़ात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत असून, एरव्ही जानेवारी महिन्यात जाहीर होणारा पाणीटंचाई कृती आराखडा यंदा मात्र डिसेंबरमध्येच जाहीर झाला आहे. ५१0 गावांच्या या आराखडयात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या असून, त्यावर ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.

ठळक मुद्देपाणीटंचाईची झळ ५१0 गावात ५७८ उपाययोजनांवर ४.४८ कोटींची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकरच वाशिम जिल्हय़ात पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत असून, एरव्ही जानेवारी महिन्यात जाहीर होणारा पाणीटंचाई कृती आराखडा यंदा मात्र डिसेंबरमध्येच जाहीर झाला आहे. ५१0 गावांच्या या आराखडयात टंचाई निवारणाच्या ५७८ उपाययोजना आखण्यात आल्या असून, त्यावर ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्च होणार असल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली.जिल्ह्यात उद्भवणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी कृती आराखडा तयार करून उपाययोजना आखल्या जातात. दरम्यान, २0१७ मधील कृती आराखडा चालू वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात जाहीर झाला होता. २५२ गावांमध्ये करावयाच्या २५२ उपाययोजनांसाठी २.१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदा मात्र डिसेंबरमध्येच प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ ५७८ उपाययोजनांची आखणी केली असून, त्यासाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. 

जिल्हय़ात मंगरूळपीर तालुका ‘डेंजर झोन’मध्येजिल्हय़ातील इतर तालुक्यांच्या तुलनेत यंदा मंगरूळपीर तालुका पाणीटंचाईच्या बाबतीत ‘डेंजर झोन’मध्ये आहे. या तालुक्यातील १५ लघुप्रकल्पांमध्ये आजमितीस केवह १0.५0 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ मालेगाव तालुक्याचा क्रमांक लागत असून, या तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पात केवळ ३.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, २१ लघुप्रकल्पांमध्ये १२ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे पाणीटंचाई कृती आराखड्यातही या तालुक्यांना झुकते माप देण्यात आले.

४९१ विहिरींचे होणार अधिग्रहण!पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार जिल्हय़ातील ४९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून, त्याद्वारे पाणी पुरविण्यात येईल.

वाशिम शहरात होतोय दहा दिवसाआड पाणीपुरवठाएकबुर्जी प्रकल्पात सध्या केवळ ३ दलघमी पाणी शिल्लक आहे. ते आगामी किमान सहा महिने पुरवावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणी कपातीचे धोरण अंगीकारण्यात आले असून, शहराला सध्या आठ ते दहा दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे.

७४ गावांमध्ये टँकरने होणार पाणीपुरवठाजिल्हय़ातील पाणीटंचाईग्रस्त ५१0 गावांपैकी ७४ गावांना टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. - 

टॅग्स :washimवाशिमwater transportजलवाहतूक