शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘वॉटर कप’मधील विळेगाववासियांच्या श्रमदानाची फलश्रृती;  शेततळे भरले काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:16 IST

वाशिम: कारंजा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत यंदा सहभागी झालेल्या विळेगाववासियांच्या श्रमदानाची फलश्रृती झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कारंजा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत यंदा सहभागी झालेल्या विळेगाववासियांच्या श्रमदानाची फलश्रृती झाली आहे. येथील ग्रामस्थांच्या श्रमदानामुळे हे गाव पाणीदार झाले असून, या स्पर्धेंतर्गत खोदलेले शंभर चौरस फुट आकाराचे शेततळे आता काठोकाठ भरले आहे. याच कामगिरीमुळे हे गाव स्पर्धेत तालुक्यातून प्रथम आले आहे.पाणी फाऊंडेशनच्यावतीने यंदा आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत कारंजा तालुक्यातील ३० गावांनी सक्रीय सहभाग घेत श्रमदानातून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केली. यामध्ये विळेगावचाही समावेश होता. विळेगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून गावकºयांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत होता. प्रत्येक उन्हाळ्यात महिला, पुरुषांसह बालकांनाही पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या पाणीटंचाईला हद्दपार करण्याचा निर्धार येथील गावकºयांनी केला आणि वॉटर कप स्पर्धेंतर्गत श्रमदानातून जलसंधारणाची अनेक कामे केली. माती नाला बांध, दगडी बांध, ढाळीचे बांध, गॅबियन बंधारे, सीसीटी यांच्यासह रोपवाटिका आणि शंभर चौरस मीटर आकाराच्या भव्य शेततळ्याचाही समावेश आहे. शेततळ्याच्या कठीण कामासाठी त्यांनी जेसीबी मशीनचाही आधार घेतला. आता या कामाचे फलित झाले असून, गावातील पाणी साठवण क्षमता लाखो लीटरने वाढली आहे. कारंजा तालुक्यात गुरुवार १६ आॅगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे वॉटर कप स्पर्धेत केलेल्या सर्व कामांच्या ठिकाणी मोठा जलसंचय झाला असून, येथील शेततळे आता काठोकाठ भरले आहे. त्यामुळे विळेगाववासियांची पाणीटंचाईची समस्या कायमच मिटणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा