शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मालेगाव तालुक्यातील ४२ गावांवर पाणीटंचाईचे संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 15:54 IST

मालेगाव - जानेवारी  ते मार्च या तीन महिन्यात मालेगाव तालुक्यातील ४२ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासंदर्भातचा अहवाल पंचायत समिती प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सादर केला.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा अहवाल सादरमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणने उपाययोजना करण्यासाठी नियोजन चालविले आहे.

मालेगाव - जानेवारी  ते मार्च या तीन महिन्यात मालेगाव तालुक्यातील ४२ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासंदर्भातचा अहवाल पंचायत समिती प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सादर केला.

आमदार अमित झनक यांनी २७ नोव्हेंबरला पाणीटंचाईसंदर्भात आढावा बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने चाचपणी करून ग्रामपंचायत स्तरावरून पाणीटंचाई व उपाययोजना यासंदर्भात अहवाल मागविले होते. पाणीटंचाई निवारण कक्षाचे प्रमुख श्रीराम आदमणे यांनी तातालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांशी संपर्क साधून पाणीटंचाईसंदर्भात सद्यस्थिती, भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई व करावयाच्या उपाययोजना आदींची माहिती मागविली होती. त्या अनुषंगाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत ४२ गावांत पाणीटंचाई उदभवण्याची माहिती सादर झाली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ विहिर किंवा बोअर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, बोअरवेल आदी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. गांगलवाडी, देवठाणा खांब, वरदरी बु., खेर्डी, पांगरी कुटे, एकांबा, पिंपळवाडी, खैरखेडा, वाकळवाडी, भिलदूर्ग, काळाकामठा यासह १२ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. कायमस्वरुपी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार अमित झनक यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने उपाययोजना करण्यासाठी नियोजन चालविले आहे.

यावर्षी मालेगाव तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. भिलदूर्गसारख्या डोंगराळ भागातील गावाला नदीपात्रातील झरे शोधून पाणी आणण्याची कसरत करावी लागते. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यातील उपाययोजना प्रत्यक्षात साकारल्या जातात की कागदावरच राहतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी