शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मालेगाव तालुक्यातील ४२ गावांवर पाणीटंचाईचे संकट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 15:54 IST

मालेगाव - जानेवारी  ते मार्च या तीन महिन्यात मालेगाव तालुक्यातील ४२ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासंदर्भातचा अहवाल पंचायत समिती प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सादर केला.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा अहवाल सादरमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणने उपाययोजना करण्यासाठी नियोजन चालविले आहे.

मालेगाव - जानेवारी  ते मार्च या तीन महिन्यात मालेगाव तालुक्यातील ४२ गावांमध्ये पाणीटंचाई उद्भवण्याचे संकेत असून, पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासंदर्भातचा अहवाल पंचायत समिती प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सादर केला.

आमदार अमित झनक यांनी २७ नोव्हेंबरला पाणीटंचाईसंदर्भात आढावा बैठक घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने चाचपणी करून ग्रामपंचायत स्तरावरून पाणीटंचाई व उपाययोजना यासंदर्भात अहवाल मागविले होते. पाणीटंचाई निवारण कक्षाचे प्रमुख श्रीराम आदमणे यांनी तातालुक्यातील सरपंच व ग्रामसेवकांशी संपर्क साधून पाणीटंचाईसंदर्भात सद्यस्थिती, भविष्यात उद्भवणारी पाणीटंचाई व करावयाच्या उपाययोजना आदींची माहिती मागविली होती. त्या अनुषंगाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत ४२ गावांत पाणीटंचाई उदभवण्याची माहिती सादर झाली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ विहिर किंवा बोअर अधिग्रहण, तात्पुरती नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, बोअरवेल आदी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. गांगलवाडी, देवठाणा खांब, वरदरी बु., खेर्डी, पांगरी कुटे, एकांबा, पिंपळवाडी, खैरखेडा, वाकळवाडी, भिलदूर्ग, काळाकामठा यासह १२ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. कायमस्वरुपी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार अमित झनक यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने उपाययोजना करण्यासाठी नियोजन चालविले आहे.

यावर्षी मालेगाव तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. भिलदूर्गसारख्या डोंगराळ भागातील गावाला नदीपात्रातील झरे शोधून पाणी आणण्याची कसरत करावी लागते. पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यातील उपाययोजना प्रत्यक्षात साकारल्या जातात की कागदावरच राहतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी तालुक्यातील सरपंचांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी