शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

लोकसहभागातून विहिर पूनर्भरण; आसरा माता मंडळाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:09 IST

वाशिम :  पाणी हे जीवन आहे, पाण्याचा वापर जपून करा अशी जनजागृती करीत लोकसहभागातून विहिर पूर्नभरण करुन एक आगळा वेगळा उपक्रम वाशिम येथील आसरा माता मंडळाच्यावतिने करण्यात आला.

ठळक मुद्देउपमुख्याध्यापक सुरेश विष्णुपंत खरावण यांनी जलपूर्नभरणाचा विचार काही वर्षांआधी परिसरातील नागरिकांसमोर मांडला. दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर झाल्याने दरवर्षी विहिर पूनर्भरण कार्यक्रम स्वयंस्फुर्तीन नागरिक एकत्र येवून करताहेत.

- नंदकिशोर नारे वाशिम :  पाणी हे जीवन आहे, पाण्याचा वापर जपून करा अशी जनजागृती करीत लोकसहभागातून विहिर पूर्नभरण करुन एक आगळा वेगळा उपक्रम वाशिम येथील आसरा माता मंडळाच्यावतिने करण्यात आला.  या जलपूर्नभरण कार्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.वाशिम शहरातील काटीवेश, सुभाष चौक परिसरात दरवर्षी जाणवत असलेली पाणी टंचाई लक्षात घेता सदर उपक्रम याच भागातील रविवासी तथा उपमुख्याध्यापक सुरेश विष्णुपंत खरावण यांनी जलपूर्नभरणाचा विचार काही वर्षांआधी परिसरातील नागरिकांसमोर मांडला. त्याला नागरिकांनी होकार दिला. त्यानंतर लोकसहभागातून झालेल्या कामामुळे दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर झाल्याने दरवर्षी विहिर पूनर्भरण कार्यक्रम स्वयंस्फुर्तीन नागरिक एकत्र येवून करताहेत. त्याचा फायदा या परिसरातील नागरिकांना असा झाला की, दरवर्षी वाशिम शहरामध्ये सर्वत्र पाणी टंचाई जाणवत असतांना या भागात मात्र पाण्याची मोठया प्रमाणात रेलचेल असते. जलसंकटावर मात करण्यासाठी खरावण यांच्या पुढाकाराने व परिसरातील नागरिकांच्या सहायाने केलेल्या विहिर पूनर्भरण ठिकाणी घराच्या छतावरील पाणी सोडले तर याचा फायदा होईल म्हणून २५ बाय २५ फूट टिन व १५ बाय १५ चा स्लॅब यावर पडणारे पावसाचे पाणी पाईपव्दारे गाळून विहिरीत सोडावे असा विचार आला.  परंतु हे करतांना विहिरीचे व घराचे अंतर ६० फूट लांब असल्याने येणारा खर्च परवडण्यासारखा नव्हता. म्हणून त्यांनी एका दोघांचे सहकार्य घेवून हा उपक्रम राबवायचा ठरविले. शेजारीच राहत असलेले राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे सचिव डॉ. प्रदिप फाटक, पुरुषोत्तम दुरतकर त्यांच्याकडे ही कल्पना मांडली.  त्यांनी लगेच होकार दिल्याने आसरा माता मंडळाच्यावतिने अशा बॅनरखाली डॉ. प्रदिप फाटक यांच्या हस्ते नारळ फोडून रितसर उदघाटन झाले. त्याचा फायदा उन्हाळयात जाणवणाºया पाणी टंचाईतून झाला. आता दरवर्षी हा उपक्रम नित्यनेमाने राबविण्यात येत असून यामध्ये दिवसेंदिवस नागरिकांचा सहभागही वाढतोय. पावसाळा सुरु होण्याआधी दरवर्षी  याचप्रकारे सतत पाईप लावणे व पावसाळा संपला की, व्यवस्थित काढण्याची जबाबदारी आजही पार पाडल्या जात आहे. यावर्षी या लोकसहभागामध्ये महिलांनी सुध्दा स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद नोंदवून या मोलाच्या कार्याला हातभार लावला. या आसरा माता मंडळाच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतूक केल्या जात आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी