शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

लोकसहभागातून जलसंधारणाची कामे;  साखरावासियांनी केली पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:37 IST

वाशिम : आदर्श ग्राम योजनेंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत पिढ्यानपिढ्या सोसलेल्या पाणीटंचाईवर कायम मात करण्याची असाधारण कामगिरी तालुक्यातील साखरावासियांनी केली.

ठळक मुद्दे जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असताना साखरा येथे मात्र दुष्काळाची पुसटशी सावलीही दिसत नाही.  जनजागृतीमुळे १२ हेक्टर जमिनीवर खोल समतल चर, ४२१  हेक्टर जमीनीवर बांध बंधीस्तीचे काम करण्यात आले.सिमेंटचे नाले, बांधांसह गावातील सांडपाणी जमिनीत मुरविले शिवारातील वाहते पाणी त्याच ठिकाणी मुरविले.

वाशिम : आदर्श ग्राम योजनेंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत पिढ्यानपिढ्या सोसलेल्या पाणीटंचाईवर कायम मात करण्याची असाधारण कामगिरी तालुक्यातील साखरावासियांनी केली. त्यामुळेच  येथील सिंचन क्षेत्र अडिचपटीने वाढत १०० हेक्टरवरून २५० हेक्टर झाले, तसेच अल्प पावसामुळे जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असताना साखरा येथे मात्र दुष्काळाची पुसटशी सावलीही दिसत नाही. 

 वाशिम जिल्ह्यातील मौजे साखरा ता.जि.वाशिम येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, यांनी २८ नोव्हेंबर २०११ ला साखरा येथे ग्रामसभा घेऊन गावकºयांचे सहकार्य  व लोकसहभाग, श्रमदान करण्याची जिद्द पाहून या गावाची आदर्श गाव योजनेत निवड केली. साखरा ग्रामस्थ तथा कृ षी मित्र बहुद्देशीय संस्थ बोराळाचे  अध्यक्ष आर.आर.वानखेडे, सचिव नारायण महाले यांनी केलेल्या जनजागृतीमुळे १२ हेक्टर जमिनीवर खोल समतल चर, ४२१  हेक्टर जमीनीवर बांध बंधीस्तीचे काम करण्यात आले. ज्या ठिकाणी नाल्याचा ओघळी उगम होतो. त्या ठिकाणचा गाळ व पाणी वाहून जाऊ नये म्हणून वरच्या भागामध्ये दोन नाल्यावर जाळीचे बंधारे करण्यात आले. जाळीचे बंधारे निर्मितीनंतर नाल्यांमध्ये रिचार्ज शाफ्टची कामे करण्यात आली. सिमेंटचे नाले, बांधांसह गावातील सांडपाणी जमिनीत मुरविले शिवारातील वाहते पाणी त्याच ठिकाणी मुरविले. यामुळे गावाच्या पाण्याची पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाली. यामुळे गावातील सिंचना क्षमता १०० हेक्टर वरुन २५० हेक्टरवर आली आहे, हल्ली साखरा गावात, गहु, हरभा, कांदे, लसन, गोभी,  दोडका, फळबाग ही पिक शाश्वतरित्या घेतली जात आहेत. तसेच ओल्या चाºयामुळे  दुग्ध व्यवसायात वृध्दी झाली आहे. या जलसाक्षरतेमुुळे  रब्बी पिक वाढल्याने  मजुराचे स्थलांतरही थांबले आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी