शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कारंजात खोलीकरणातून नाल्यांचा संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:19 IST

कारंजा [वाशिम] : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानातून जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा [वाशिम] : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानातून जलसंधारणाची शेकडो कामे करण्यात येत आहेत. या अंतर्गत कारंजा तालुक्यातील पानविहीर येथे लघू पाटबंधारे विभागाने दोन नाल्यांचे खोलीकरण करताना त्यांचा सुरेख संगम केला आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना मोठा फायदा होणार आहे. राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून राज्यभरात सुजलाम, सुफलाम अभियान राबवून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत वाशिम जिल्ह्यात ४९ शेततळी, नदी खोलीकरण, नाला खोलीकरण, सीसीटी, डीप सीसीटी, ढाळीच्या बांधासह जलसंधारणाची इतर अनेक कामे केली जात आहेत. महसून विभाग, कृषी विभाग, जि.प. लघू सिंचन विभाग, वनविभाग आणि लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत आहेत. याच अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील पानविहीर येथे बुजलेल्या दोन नाल्यांचे खोलीकरण लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दोन वेगवेगळ्या दिशेतून येणाºया या नाल्यांचे खोदकाम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आणि हे दोन्ही नाले तिसºया नाल्यास जोडण्यात आल्याने या नाल्यांचा संगमच झाला आहे. याकरिता शाखा अभियंता अब्दुल सईद हे सहकार्य करत आहे या कामांमुळे पानविहीर येथील पाणी पातळी वाढण्यासह नाल्यातील पाण्याचा लाभ शेतकºयांना होणार आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा