शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

विभागीयस्तरावर जलदूत, जलप्रेमींना जलसंधारणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:44 IST

जलदूत, जलनायक आणि पर्यावरण तज्ञांनी जलसंधारणाबाबत मुलभूत आणि अत्यावश्यक उपाययोजनांबाबत विभागातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

वाशिम: पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास परिषद प्रबोधनीच्यावतीने राज्यातील भूजल पातळीची स्थिती आणि जलसंधारणाबाबत जलदूत, जलप्रेमींना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत अमरावती येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शासनाच्या जलचळवळीत कार्यरत जलदूत, जलनायक आणि पर्यावरण तज्ञांनी जलसंधारणाबाबत मुलभूत आणि अत्यावश्यक उपाययोजनांबाबत विभागातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.अमरावती येथे आयोजित कार्यशाळेत २५ फेब्रुवारी रोजी जलदूत दिलिप काळे यांनी पाण्याचे महत्त्व व जलसाक्षरता कशासाठी या विषयावर सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले, तर दुपारच्या सत्रात जलसंधारण करण्याची कारणे आणि उपाय यावर गजानन काळे यांनी मार्गदर्शन केले, सायंकाळच्या सत्रा संजय कराड यांनी भुरचना शास्त्रबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी अमरावती विद्यापीठ परिसर अभ्यास दौरा करून श्रमदान करण्यात आले,तसेच दुपारच्या सत्रात अरविंद कडबे यांनी जलप्रदुषण, सेंद्रिय शेतीच्या विविध पद्धतीबाबत मार्गदर्शन केले, तर सायंकाळी किरण हातगावकर यांनी पाणी वाटप संस्थांची कार्ये आणि आवश्यक तेवर प्रकाश टाकला. २७ फेबु्रवारी रोजी राज्याचे जलनायक तथा पर्यावरण तज्ज्ञ डॉ निलेश हेडा यांनी सकाळच्या सत्रात जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी नदी खोरे समजून घेणे किती आवश्यक आहे, या विषयावर मार्गदर्शन केले, तर दुपारच्या सत्रात जलदूत रविंद्र इंगोले यांनी पाण्याच्या ताळेबंदाबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सत्रात कार्यशाळेचे मुल्यमापन व चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत विभागातील ६० पेक्षा अधिक जलदूत आणि जलप्रेमीनी सहभाग घेतला होता.

जलसंधारणासाठी राज्य शासनाच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यभरात जलप्रेमींना जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. यासाठी राज्यस्तरापासून गावस्तरापर्यंत मार्गदर्शक म्हणून जलनायक, जलदुतांची निवड करण्यात आली आहे.-डॉ. निलेश हेडाराज्य जलनायक, तथा पर्यावरण तज्ज्ञ 

टॅग्स :washimवाशिम