शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विभागीयस्तरावर जलदूत, जलप्रेमींना जलसंधारणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:44 IST

जलदूत, जलनायक आणि पर्यावरण तज्ञांनी जलसंधारणाबाबत मुलभूत आणि अत्यावश्यक उपाययोजनांबाबत विभागातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

वाशिम: पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास परिषद प्रबोधनीच्यावतीने राज्यातील भूजल पातळीची स्थिती आणि जलसंधारणाबाबत जलदूत, जलप्रेमींना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत अमरावती येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शासनाच्या जलचळवळीत कार्यरत जलदूत, जलनायक आणि पर्यावरण तज्ञांनी जलसंधारणाबाबत मुलभूत आणि अत्यावश्यक उपाययोजनांबाबत विभागातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.अमरावती येथे आयोजित कार्यशाळेत २५ फेब्रुवारी रोजी जलदूत दिलिप काळे यांनी पाण्याचे महत्त्व व जलसाक्षरता कशासाठी या विषयावर सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले, तर दुपारच्या सत्रात जलसंधारण करण्याची कारणे आणि उपाय यावर गजानन काळे यांनी मार्गदर्शन केले, सायंकाळच्या सत्रा संजय कराड यांनी भुरचना शास्त्रबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी अमरावती विद्यापीठ परिसर अभ्यास दौरा करून श्रमदान करण्यात आले,तसेच दुपारच्या सत्रात अरविंद कडबे यांनी जलप्रदुषण, सेंद्रिय शेतीच्या विविध पद्धतीबाबत मार्गदर्शन केले, तर सायंकाळी किरण हातगावकर यांनी पाणी वाटप संस्थांची कार्ये आणि आवश्यक तेवर प्रकाश टाकला. २७ फेबु्रवारी रोजी राज्याचे जलनायक तथा पर्यावरण तज्ज्ञ डॉ निलेश हेडा यांनी सकाळच्या सत्रात जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी नदी खोरे समजून घेणे किती आवश्यक आहे, या विषयावर मार्गदर्शन केले, तर दुपारच्या सत्रात जलदूत रविंद्र इंगोले यांनी पाण्याच्या ताळेबंदाबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सत्रात कार्यशाळेचे मुल्यमापन व चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत विभागातील ६० पेक्षा अधिक जलदूत आणि जलप्रेमीनी सहभाग घेतला होता.

जलसंधारणासाठी राज्य शासनाच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यभरात जलप्रेमींना जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. यासाठी राज्यस्तरापासून गावस्तरापर्यंत मार्गदर्शक म्हणून जलनायक, जलदुतांची निवड करण्यात आली आहे.-डॉ. निलेश हेडाराज्य जलनायक, तथा पर्यावरण तज्ज्ञ 

टॅग्स :washimवाशिम