शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अडोळ प्रकल्प तुडूंब; पण सिंचनासाठी वीजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 14:17 IST

शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पात सध्या १०० टक्के जलसाठा असल्यामुळे सिंचनाच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. मात्र, दुसरीकडे पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा नसल्याने ४०० हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पात सध्या १०० टक्के जलसाठा असल्यामुळे सिंचनाच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत. मात्र, दुसरीकडे पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा नसल्याने ४०० हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यावर्षी मालेगाव तालुक्यात बºयापैकी पाऊस पडला. त्यामुळे सिंचन प्रकल्पात समाधानकारक जलसाठा आहे. शिरपूरपासून नजीक असलेला अडोळ सिंचन प्रकल्प तर १०० टक्के तुडुंब भरला आहे. त्यामुळे वाघी, खंडाळा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव यासह इतर गावच्या शेतकºयांना रब्बी हंगामात सिंचन करता येईल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. १०० टक्के जलसाठा उपलब्ध असला तरी सिंचनासाठी लागणारी वीज या परिसरातील शेतकºयांना आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. शिरपूर येथे उभारणी केलेल्या ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर मागील महिन्यात कामरगाव येथील वीज उपकेंद्रात स्थलांतरीत केल्याने शिरपूर परिसरातील वीजपुरवठा अनियमित झाला. वीजपुरवठ्याची समस्या अद्याप निकाली निघाली नसल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण झाला आहे. अडोळ प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असतानाही वीजपुरवठ्याअभावी सिंचन करता येत नसल्याची आपबिती वाघी, खंडाळा, ढोरखेडा, बोराळा, शेलगाव यासह इतर गावच्या शेतकºयांनी कथन केली. शिरपूर परिसरातील वीजसमस्या निकाली काढावी, अशी मागणी शेतकºयांनी बुधवारी केली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी