शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Washim ZP Election : कुणालाच स्पष्ट बहूमत नाही; राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:40 IST

काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (१२) आणि शिवसेना (६) या तीन पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याची एकंदरित स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळावर लढलेल्या वाशिमजिल्हा परिषदेच्या ५२ सर्कलचा निकाल बुधवार, ८ जानेवारीला जाहीर झाला. त्यात बहुमतासाठी लागणारा २७ चा फिगर गाठण्यात कुणालाच यश मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला असून तो सोडविण्यासाठी काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (१२) आणि शिवसेना (६) या तीन पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याची एकंदरित स्थिती आहे.भाजपाशी काडीमोड घेत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने महाविकास आघाडी करून राज्यात सत्तास्थापन केली; मात्र हे समीकरण जिल्हा परिषद निवडणूकीत जुळून आले नाही. तीनही पक्षांसह भाजपा, भारिप-बमसं, स्वाभिमानी आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीने स्वतंत्ररित्या निवडणूक लढली. गतवेळच्या निवडणूकीत सर्वाधिक १७ जागांवर विजय मिळवून जिल्हा परिषदेत काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष राहिला होता. यावेळी मात्र काँग्रेसला ९ जागांवरच विजय मिळविता आला. राष्ट्रवादी काँग्रेसला गतवेळच्या ८ जागांमध्ये वाढ होत १२ जागांवर विजय मिळाला. भाजपाचे गतवेळी जिल्हा परिषदेत ६ सदस्य होते, यंदा या पक्षाने ७ जागांवर विजय मिळविला. याशिवाय भारिप-बमसंने ९ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. माजी खासदार देशमुख यांच्या जनविकास आघाडीलाही ६ जागांवर विजय मिळाला; तर स्वाभिमानी पक्षाला एका व अपक्षांना २ जागांवर समाधान मानावे लागले. असे असले तरी स्पष्ट बहुमतासाठी लागणारा २७ चा फिगर कुणाकडेही नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी राज्याच्या सत्तास्थापनेत जुळलेले महाविकास आघाडीचे समीकरण वाशिम जिल्हा परिषदेतही जुळवून आणावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमZP Electionजिल्हा परिषद