शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

Washim ZP Election : कुणालाच स्पष्ट बहूमत नाही; राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:40 IST

काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (१२) आणि शिवसेना (६) या तीन पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याची एकंदरित स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळावर लढलेल्या वाशिमजिल्हा परिषदेच्या ५२ सर्कलचा निकाल बुधवार, ८ जानेवारीला जाहीर झाला. त्यात बहुमतासाठी लागणारा २७ चा फिगर गाठण्यात कुणालाच यश मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला असून तो सोडविण्यासाठी काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (१२) आणि शिवसेना (६) या तीन पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याची एकंदरित स्थिती आहे.भाजपाशी काडीमोड घेत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने महाविकास आघाडी करून राज्यात सत्तास्थापन केली; मात्र हे समीकरण जिल्हा परिषद निवडणूकीत जुळून आले नाही. तीनही पक्षांसह भाजपा, भारिप-बमसं, स्वाभिमानी आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीने स्वतंत्ररित्या निवडणूक लढली. गतवेळच्या निवडणूकीत सर्वाधिक १७ जागांवर विजय मिळवून जिल्हा परिषदेत काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष राहिला होता. यावेळी मात्र काँग्रेसला ९ जागांवरच विजय मिळविता आला. राष्ट्रवादी काँग्रेसला गतवेळच्या ८ जागांमध्ये वाढ होत १२ जागांवर विजय मिळाला. भाजपाचे गतवेळी जिल्हा परिषदेत ६ सदस्य होते, यंदा या पक्षाने ७ जागांवर विजय मिळविला. याशिवाय भारिप-बमसंने ९ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. माजी खासदार देशमुख यांच्या जनविकास आघाडीलाही ६ जागांवर विजय मिळाला; तर स्वाभिमानी पक्षाला एका व अपक्षांना २ जागांवर समाधान मानावे लागले. असे असले तरी स्पष्ट बहुमतासाठी लागणारा २७ चा फिगर कुणाकडेही नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी राज्याच्या सत्तास्थापनेत जुळलेले महाविकास आघाडीचे समीकरण वाशिम जिल्हा परिषदेतही जुळवून आणावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमZP Electionजिल्हा परिषद