शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
12
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
13
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
14
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
15
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

वाशिम : पीक कर्जमाफीसाठी ‘वेट अँण्ड वॉच’! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:12 IST

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेच्या ६३ हजार ५५८ पैकी आतापर्यंत केवळ ३४२४ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, त्याची टक्केवारी ५.३८ अशी येते.

ठळक मुद्दे राष्ट्रीयीकृत बँकेचे ६ टक्के शेतकरी कर्जमुक्त एकूण ८३ टक्के लाभार्थींना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकेच्या ६३ हजार ५५८ पैकी आतापर्यंत केवळ ३४२४ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, त्याची टक्केवारी ५.३८ अशी येते. एकूण १ लाख ६४ हजार ५३४ पैकी २८ हजार ३३३ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, ही टक्केवारी १७.२२ अशी येते. दरम्यान, ९ डिसेंबर रोजी राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख वाशिम जिल्हा दौर्‍यावर येत असल्याने किमान मंत्र्यांनी तरी पात्र शेतकर्‍यांना कधीपर्यंत कर्जमाफी मिळेल यासंदर्भात स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहेत.जून २0१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर  केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची र्मयादा घालून कर्जमाफी योजनेची ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६0 हजार शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. छानणी व पडताळणीअंती जिल्ह्यातील एक लाख ६४ हजार ५३४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. यामध्ये राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेचे ६३ हजार ५५८, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे २१  हजार ८४८ आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७९ हजार १२८ शेतकर्‍यांचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, तांत्रिक अडचणीत ही घोषणा पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतरही या ना त्या कारणाने कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरूच राहिले. कर्जमाफीची घोषणा होऊन पाच महिन्यांचा कालावधी लोटला; आतापर्यंत शासनस्तरावरून जिल्ह्याला राष्ट्रीयकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती अशा तिनही बँका मिळून एकूण ३0 हजार ८८८ शेतकर्‍यांसाठी २५८ कोटी रुपये प्राप्त झाले. यापैकी २८ हजार ३३३ शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात १३0 कोटी रुपये जमा झाल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या ४२२९ पात्र शेतकरी लाभार्थींसाठी २३ कोटी २0 लाख रुपये शासनाकडून जिल्ह्याला प्राप्त झाले असून, त्यापैकी ३३२४ शेतकर्‍यांना १३.१९ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम कर्जखात्यात वळती करण्यात आली. ही टक्केवारी ५.३८ अशी येते. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या २0६९ शेतकरी लाभार्थींसाठी १३ कोटी ९४ लाख रुपये शासनाकडून जिल्ह्याला प्राप्त झाले. त्यापैकी २0६९ लाभार्थींच्या कर्जखात्यात १३ कोटी ९४ लाख रुपये वळते करण्यात आले.  ही टक्केवारी ९.४0 अशी येते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ७९ हजार १२८ शेतकर्‍यांपैकी २४ हजार ५९0 शेतकर्‍यांसाठी शासनाकडून २२0 कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले. त्यापैकी २२ हजार ८४0 शेतकर्‍यांना १0२ कोटी ९४ लाख रुपये कर्जमाफीचा लाभ मिळाला. राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती अशा तिनही बँका मिळून मिळून २५५५ शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात येत्या दोन-तीन दिवसांत कर्जमाफीची रक्कम वळती केली जाणार आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. अद्याप जिल्ह्यातील एकूण १ लाख ३३ हजार ६४६ अर्थात ८२.७८ टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असून, कर्जमाफी केव्हा मिळणार, असा प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख हे शनिवार, ९ डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात आढावा बैठक घेणार आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ८२.७८ टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफी केव्हा मिळेल, याबाबत मंत्र्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी