शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

वाशिम : संचारबंदी शिथिल होताच रस्त्यांवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:58 IST

अत्यावश्यक कामासाठी संचारबंदीत ८ ते १२ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर सर्वत्र लॉकडाऊन व जिल्हयात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीत कोणीही घराच्या बाहेर निघु नये अश्याा सूचना जिल्हा प्रशासनाने केले असून नागरिकांच्यावतिने नियमांचे पालनही होतांना दिसून येत आहे. परंतु अत्यावश्यक कामासाठी संचारबंदीत ८ ते १२ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. या संचारबंदी शिथीलते दरम्यान मात्र रस्त्यांवर मोठया प्रमाणात गर्दी होत असून ती थांबविण्यासाठी प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकांतून उमटत आहेत.वाशिम जिल्हयात कोरोना विषाणुचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाचे प्रयत्न कौतूकास्पद आहेत. सर्वत्र जिल्हाबंदीनंतर एकही कोरोना संदिग्ध रुग्ण जिल्हयात आढळला नाही. जो रुग्ण आढळला होता त्याचीही प्रकृती ठणठणीत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतिने जिल्हाधिकारी रुषिकेष मोडक रात्रंदिवस झटून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. तर पोलीस अधीक्षक वसंत परदेसी संभाव्य धोका पाहता आपल्या कर्मचाऱ्यांना घरदार सोडून कर्तव्य बजावण्यास सांगत आहेत. जिल्हातील प्रत्येक नागरिक सुखरुप रहावा यासाठी प्रयतन करीत असतांना नागरिक मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखतांना दिसून येत नाहीत. अत्यावश्यक काम असल्यास घरातील एका व्यक्तीने ते बाहेर निघून पूर्ण करणे गरजेचे असताना शिथील काळात नागरिक लहान मुलांसह आपल्या कुटुंबियासह बाहेर निघत आहेत. त्यांना कोणी समजावून सांगावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोराना विषाणुच्या पार्श्यभूमिवर नागरिकांनी घरातच राहून येणाºया धोक्यापासून सावध राहण्याचे प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे , याकडे सर्वांनी गांभीर्याने घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतिने कळकळीने केल्या जात आहे.

सोशल डिस्टन्सिंगला तिलांजली!कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हयात लागू असलेल्या संचारबंदीचे नागरिकांकडून पालीन होत असले तरी संचारबंदी शिथीलतेमध्ये मात्र रस्त्यांवर , दुकानांवर मोठया प्रमाणात नागरिक गर्दी करुन सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करताना दिसून येत नाही. कोरोना विषाणु संसर्गजन्य असल्याने सोशल डिस्टन्सिंग अतिशय महत्वाचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासन वारंवार सूचना देऊन, गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवत असतांना काही नागरिक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना तिलांजली देताना दिसून येत आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेऊन मी व माझया कुटुंबियांचे संरक्षणासाठभ् सोशल डिस्टन्सिंगचे पालन करेल हे ठरविणे गरजेचे आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºयांवर कठोर कारवाईची गरज आहे.कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता गर्दी टाळाकोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. नागरिकांनीदेखील कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडू नये.तसेच गर्दी तर मुळीच करु नये.-ऋषिकेश मोडक, जिल्हाधिकारी वाशिम

 

टॅग्स :washimवाशिम