शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वाशिममधील रस्ते नुतनीकरणात प्रचंड दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 15:41 IST

एकाचवेळी अनेक ठिकाणचे मुख्य रस्ते खोदून ठेवले असताना सर्वच ठिकाणी कामातील संथगती आणि दिरंगाईमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक नगर परिषदेने शहरांतर्गत तथा रहदारीच्या मुख्य रस्त्यांच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, एकाचवेळी अनेक ठिकाणचे मुख्य रस्ते खोदून ठेवले असताना सर्वच ठिकाणी कामातील संथगती आणि दिरंगाईमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषत: खोदलेल्या रस्त्यांवर ‘बोल्डर गिट्टा’ टाकण्यात आल्याने त्यावरून वाहने चालविणे अशक्य होत असून नगर परिषदेच्या या उदासिनतेप्रती शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.वाशिम शहर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असले तरी शहराची व्याप्ती अधिक नसून मुख्य रस्त्यांची संख्या व त्यांची लांबी-रुंदी देखील मर्यादितच आहे. शहरात पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यान एकमेव मुख्य बाजारपेठ वसलेली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता नादुरूस्त होवून ठिकठिकाणी खड्डे पडले होते. दरम्यान, गणेशोत्सवाच्या आधी ११ सप्टेंबर २०१८ रोजी नगर परिषदेने या रस्त्याचे काम सुरू केले. यासाठी संपूर्ण रस्ता खोदून त्यावर ‘बोल्डर गिट्टा’ अंथरण्यात आला. मात्र, एक महिना उलटूनही रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरूवात देखील झालेली नाही. शहरातील इतर ठिकाणच्या रस्ता कामांचीही अशीच स्थिती असल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.  

दिवसभर नव्हे; तर रात्रीच्या वेळी केले जाते थातूरमातूर काम!

जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केल्या जाणारे शिवाजी चौक ते पाटणी चौकादरम्यानच्या रस्ता नुतनीकरणाचे काम दिवसभर बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू केले जाते. यामुळे नागरिकांसोबतच नगर परिषदेच्या जबाबदार एकाही अधिकाºयाचे रस्ता कामाच्या दर्जावर विशेष नियंत्रण राहिलेले नाही. तथापि, रस्त्याचे काम रात्रीच्या सुमारास करण्याचा प्रकार अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. 

वाशिम शहरातील शिवाजी चौक ते पाटणी चौक यादरम्यानच्या रस्त्यासह अन्य ठिकाणच्या कामांमधील दिरंगाई दुर करून कामाची गती वाढविण्यासंदर्भात कंत्राटदारांना सक्त निर्देश दिले जातील. - गणेश शेट्टेमुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका