शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

वाशिममधील रस्ते नुतनीकरणात प्रचंड दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 15:41 IST

एकाचवेळी अनेक ठिकाणचे मुख्य रस्ते खोदून ठेवले असताना सर्वच ठिकाणी कामातील संथगती आणि दिरंगाईमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक नगर परिषदेने शहरांतर्गत तथा रहदारीच्या मुख्य रस्त्यांच्या नुतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, एकाचवेळी अनेक ठिकाणचे मुख्य रस्ते खोदून ठेवले असताना सर्वच ठिकाणी कामातील संथगती आणि दिरंगाईमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषत: खोदलेल्या रस्त्यांवर ‘बोल्डर गिट्टा’ टाकण्यात आल्याने त्यावरून वाहने चालविणे अशक्य होत असून नगर परिषदेच्या या उदासिनतेप्रती शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.वाशिम शहर हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असले तरी शहराची व्याप्ती अधिक नसून मुख्य रस्त्यांची संख्या व त्यांची लांबी-रुंदी देखील मर्यादितच आहे. शहरात पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यान एकमेव मुख्य बाजारपेठ वसलेली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता नादुरूस्त होवून ठिकठिकाणी खड्डे पडले होते. दरम्यान, गणेशोत्सवाच्या आधी ११ सप्टेंबर २०१८ रोजी नगर परिषदेने या रस्त्याचे काम सुरू केले. यासाठी संपूर्ण रस्ता खोदून त्यावर ‘बोल्डर गिट्टा’ अंथरण्यात आला. मात्र, एक महिना उलटूनही रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरूवात देखील झालेली नाही. शहरातील इतर ठिकाणच्या रस्ता कामांचीही अशीच स्थिती असल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.  

दिवसभर नव्हे; तर रात्रीच्या वेळी केले जाते थातूरमातूर काम!

जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केल्या जाणारे शिवाजी चौक ते पाटणी चौकादरम्यानच्या रस्ता नुतनीकरणाचे काम दिवसभर बंद ठेवून रात्रीच्या सुमारास सुरू केले जाते. यामुळे नागरिकांसोबतच नगर परिषदेच्या जबाबदार एकाही अधिकाºयाचे रस्ता कामाच्या दर्जावर विशेष नियंत्रण राहिलेले नाही. तथापि, रस्त्याचे काम रात्रीच्या सुमारास करण्याचा प्रकार अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. 

वाशिम शहरातील शिवाजी चौक ते पाटणी चौक यादरम्यानच्या रस्त्यासह अन्य ठिकाणच्या कामांमधील दिरंगाई दुर करून कामाची गती वाढविण्यासंदर्भात कंत्राटदारांना सक्त निर्देश दिले जातील. - गणेश शेट्टेमुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका