शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

वाशिम : विहिर अधिग्रहणाचे केवळ पाच प्रस्ताव प्राप्त! ४९९ विहिरींचे उद्दीष्ट कसे होणार साध्य? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:26 IST

वाशिम : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१० गावांमध्ये एकूण ५७८ उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक उपाययोजना विहिर अधिग्रहणाच्या (४९९) असून त्याखालोखाल टँकर/बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना आहेत. मात्र, यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याबाबत पाणीटंचाईग्रस्त गावांनी उदासिनता बाळगली असून ५ फेब्रुवारीपर्यंत विहिर अधिग्रहणाचे केवळ ५ प्रस्ताव सादर झाल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झाली.

ठळक मुद्देप्रस्ताव पाठविण्याबाबत ग्रामपंचायतींची उदासिनता

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१० गावांमध्ये एकूण ५७८ उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक उपाययोजना विहिर अधिग्रहणाच्या (४९९) असून त्याखालोखाल टँकर/बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना आहेत. मात्र, यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याबाबत पाणीटंचाईग्रस्त गावांनी उदासिनता बाळगली असून ५ फेब्रुवारीपर्यंत विहिर अधिग्रहणाचे केवळ ५ प्रस्ताव सादर झाल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झाली.पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार नळ दुरूस्तीच्या ५ उपाययोजना, टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरविण्याच्या ७४ उपाययोजना आणि खासगी विहिर अधिग्रहणाच्या ४९९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ५ फेब्रुवारीपर्यंत पाणीटंचाईग्रस्त गावांमधून विहिर अधिग्रहणाचे केवळ पाच प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात एकट्या मानोरा तालुक्यातील चार प्रस्ताव असून कारंजा तालुक्यातील एका गावाचा प्रस्ताव असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून ग्रामीण भागातील प्रशासन पाणीटंचाईसंदर्भत किती जागरूक आहे, याची प्रचिती येत आहे. 

विहिर अधिग्रहण अथवा टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांनी विनाविलंब आपले प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी