शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

वाशिम : विहिर अधिग्रहणाचे केवळ पाच प्रस्ताव प्राप्त! ४९९ विहिरींचे उद्दीष्ट कसे होणार साध्य? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:26 IST

वाशिम : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१० गावांमध्ये एकूण ५७८ उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक उपाययोजना विहिर अधिग्रहणाच्या (४९९) असून त्याखालोखाल टँकर/बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना आहेत. मात्र, यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याबाबत पाणीटंचाईग्रस्त गावांनी उदासिनता बाळगली असून ५ फेब्रुवारीपर्यंत विहिर अधिग्रहणाचे केवळ ५ प्रस्ताव सादर झाल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झाली.

ठळक मुद्देप्रस्ताव पाठविण्याबाबत ग्रामपंचायतींची उदासिनता

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ५१० गावांमध्ये एकूण ५७८ उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक उपाययोजना विहिर अधिग्रहणाच्या (४९९) असून त्याखालोखाल टँकर/बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना आहेत. मात्र, यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्याबाबत पाणीटंचाईग्रस्त गावांनी उदासिनता बाळगली असून ५ फेब्रुवारीपर्यंत विहिर अधिग्रहणाचे केवळ ५ प्रस्ताव सादर झाल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त झाली.पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार नळ दुरूस्तीच्या ५ उपाययोजना, टँकर अथवा बैलगाडीने पाणी पुरविण्याच्या ७४ उपाययोजना आणि खासगी विहिर अधिग्रहणाच्या ४९९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ५ फेब्रुवारीपर्यंत पाणीटंचाईग्रस्त गावांमधून विहिर अधिग्रहणाचे केवळ पाच प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात एकट्या मानोरा तालुक्यातील चार प्रस्ताव असून कारंजा तालुक्यातील एका गावाचा प्रस्ताव असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून ग्रामीण भागातील प्रशासन पाणीटंचाईसंदर्भत किती जागरूक आहे, याची प्रचिती येत आहे. 

विहिर अधिग्रहण अथवा टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांनी विनाविलंब आपले प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.- शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी