शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

वाशिम : अर्धवट ‘घरकुल’ बांधणार्‍या १५00 जणांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:30 IST

वाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत मिळालेल्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट ठेवणार्‍या जवळपास १५00 जणांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस बजावून विहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अनेकांना नोटीस मिळाल्या असून, बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थींची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देविहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना रेतीघाट लिलाव रखडल्याने बांधकामात व्यत्यय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामीण भागातील विविध योजनेंतर्गत मिळालेल्या घरकुलांचे बांधकाम अर्धवट ठेवणार्‍या जवळपास १५00 जणांना जिल्हा परिषद प्रशासनाने नोटीस बजावून विहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अनेकांना नोटीस मिळाल्या असून, बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थींची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येते.दारिद्रय़रेषेखालील अनेक कुटुंबांना राहण्यासाठी निवारा नाही. अशा बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकारण्यासाठी राज्य शासनाने घरकुल योजना अंमलात आणली. दारिद्रय़रेषा यादीतील गुणांकानुसार लाभार्थी निवडीची प्रक्रिया राबविली जाते. राहायला घर नाही, बांधायला पैसा नाही, अशा बेघर व अत्यल्प उत्पन्न असलेल्या लाभार्थीला या योजनेत प्राधान्यक्रम दिला जातो. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे (डीआरडीए) ही योजना राबविली जाते. रमाई घरकुल योजना तसेच प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत शेकडो लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळालेला आहे. दरम्यान, २0१३-१४ पासून ते आजतागायत अनेक लाभार्थींनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले नाही. यासंदर्भात १६ नोव्हेंबर २0१७ रोजी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा घेतल्यानंतर घरकुल योजना गांभीर्याने घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ‘अँक्शन प्लॅन’ तयार करून अर्धवट घरकुलांची शोध मोहीम जिल्हाभर राबविली. जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांचा आढावा घेऊन लाभार्थींच्या समस्या जाणून घ्या आणि घरकुलांची कामे पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचायत समिती स्तरावरून जवळपास १५00 लाभार्थींना नोटीस बजावून घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. लाभार्थींना आता नोटीस प्राप्त होत असून, घरकुल बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू झाल्या आहेत. सद्यस्थितीत रेतीघाट लिलाव रखडल्याने बांधकामात रेतीचा व्यत्यय निर्माण होत असल्याचा दावा काही लाभार्थींनी केला. या सत्रात बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागावे अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा लाभार्थींना देण्यात आला. विहित मुदतीत बांधकाम पूर्ण न झाल्यास अनुदानाची रक्कम वसूल करणे किंवा फौजदारी कारवाई आदीचा विचार केला जाणार आहे.

अपूर्ण घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांची आढावा बैठक घेण्यात आली होती. घरकुलांचे बांधकाम पूर्ण करणार्‍या लाभार्थींना नोटीस बजावून विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. लाभार्थींनीदेखील विहित मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करून प्रशासनाला सहकार्य करावे.- नितीन मानेप्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वाशिम.

टॅग्स :washimवाशिम