शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर राजगाववासियांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 16:13 IST

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तालुक्यातील राजगाववासियांनी एक आगळाच उपक्रम राबविला. या अंतर्गत संपूर्ण गावात अभियान राबवून साफसफाई करण्यात आली.

ठळक मुद्देमकर संक्रांतीच्या सणाला साधारण महिला मंडळी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करून सुवासिनींची वाणाने ओटी भरतात, तीळगुळ वाटून स्रेहबंधातील गोडवा घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. राजगाववासियांनी मात्र या सणाला अधिक अविस्मरणीय करण्यासाठी औचित्यावर संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. गावभरात सफाई अभियान राबविले; स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तालुक्यातील राजगाववासियांनी एक आगळाच उपक्रम राबविला. या अंतर्गत संपूर्ण गावात अभियान राबवून साफसफाई करण्यात आली. यामध्ये गावातील युवक मंडळीसह न्यायपालिकेतील मानद न्यायदंडाधिकारी, शिक्षक आणि इतर अधिकाºयांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 

मकर संक्रांतीच्या सणाला साधारण महिला मंडळी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करून सुवासिनींची वाणाने ओटी भरतात, तीळगुळ वाटून स्रेहबंधातील गोडवा घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. नवीन वर्षातील हा पहिला सण असताना आणि या दिवशी सूर्याचे दक्षिणायन होत असल्याने हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. राजगाववासियांनी मात्र या सणाला अधिक अविस्मरणीय करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. गावकºयांनी मकर संक्रांतीच्या औचित्यावर संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला त्यामुळे चांगलाच आधार मिळाला. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप मोरे, रजेवर आलेले भारतीय सैनिक शंकर वैरागडे, अनिल कढणे, राष्ट्रपाल जाधव, अ‍ॅड. सिद्धार्थ जाधव, वरिष्ठ लिपिक नामदेव वानखडे, लिपिक पांडुरंग गोटे, धनराज गोटे, निलेश वायचाळ, शिक्षक गोपाल तापडिया, मनोज गोटे, विकास मोरे, संतोष वायचाळ, संतोष कढणे, विकास वायचाळ, विनायक वायचाळ, कैलास वायचाळ, राजकुमार वायचाळ, पोलीस कर्मचारी दिलिप जाधव, शाळा सुधार समिती अध्यक्ष शामराव वायचाळ, तंटामूक्ती अध्यक्ष भारत खंडारे, पोलीस पाटील विजय जाधव, उपसरपंच संजय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन वायचाळ, गजानन कढणे, सुभाष मोरे, संजय मोरे, गणेश वायचाळ, किशोर वायचाळ आदिंसह गावातील युवक व ज्येष्ठांनी हातात झाडून घेऊन गावभरात सफाई अभियान राबविले. स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.

दंवडी देऊन   आवाहन

राजगावचे सरपंच अरविंद अहिरे पाटील यांच्या नेतृत्वात गावात स्वच्छ भारत, सुंदर भारत’चा संदेश देण्यासाठी चक्क्क दंवडी देण्यात आली. या दंवडीद्वारे गावकºयांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर पुणे येथे न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि राजगावातील मूळ रहिवासी पंढरी गोटे यांच्यासह विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, भारतीय सैनिक, डॉक्टर, वकील आणि प्राध्यापक मंडळींनी यात सहभाग घेतला. 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान