शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर राजगाववासियांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 16:13 IST

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तालुक्यातील राजगाववासियांनी एक आगळाच उपक्रम राबविला. या अंतर्गत संपूर्ण गावात अभियान राबवून साफसफाई करण्यात आली.

ठळक मुद्देमकर संक्रांतीच्या सणाला साधारण महिला मंडळी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करून सुवासिनींची वाणाने ओटी भरतात, तीळगुळ वाटून स्रेहबंधातील गोडवा घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. राजगाववासियांनी मात्र या सणाला अधिक अविस्मरणीय करण्यासाठी औचित्यावर संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. गावभरात सफाई अभियान राबविले; स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.

वाशिम: मकर संक्रांतीच्या औचित्यावर समाजाला स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तालुक्यातील राजगाववासियांनी एक आगळाच उपक्रम राबविला. या अंतर्गत संपूर्ण गावात अभियान राबवून साफसफाई करण्यात आली. यामध्ये गावातील युवक मंडळीसह न्यायपालिकेतील मानद न्यायदंडाधिकारी, शिक्षक आणि इतर अधिकाºयांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 

मकर संक्रांतीच्या सणाला साधारण महिला मंडळी हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करून सुवासिनींची वाणाने ओटी भरतात, तीळगुळ वाटून स्रेहबंधातील गोडवा घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. नवीन वर्षातील हा पहिला सण असताना आणि या दिवशी सूर्याचे दक्षिणायन होत असल्याने हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. राजगाववासियांनी मात्र या सणाला अधिक अविस्मरणीय करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविला. गावकºयांनी मकर संक्रांतीच्या औचित्यावर संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला त्यामुळे चांगलाच आधार मिळाला. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप मोरे, रजेवर आलेले भारतीय सैनिक शंकर वैरागडे, अनिल कढणे, राष्ट्रपाल जाधव, अ‍ॅड. सिद्धार्थ जाधव, वरिष्ठ लिपिक नामदेव वानखडे, लिपिक पांडुरंग गोटे, धनराज गोटे, निलेश वायचाळ, शिक्षक गोपाल तापडिया, मनोज गोटे, विकास मोरे, संतोष वायचाळ, संतोष कढणे, विकास वायचाळ, विनायक वायचाळ, कैलास वायचाळ, राजकुमार वायचाळ, पोलीस कर्मचारी दिलिप जाधव, शाळा सुधार समिती अध्यक्ष शामराव वायचाळ, तंटामूक्ती अध्यक्ष भारत खंडारे, पोलीस पाटील विजय जाधव, उपसरपंच संजय कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन वायचाळ, गजानन कढणे, सुभाष मोरे, संजय मोरे, गणेश वायचाळ, किशोर वायचाळ आदिंसह गावातील युवक व ज्येष्ठांनी हातात झाडून घेऊन गावभरात सफाई अभियान राबविले. स्वच्छ भारत, सुंदर भारतचा संदेश देत घरोघरी शौचालय बांधून त्याचा वापर करीत गाव हागणदरीमूक्त करण्याचे आवाहनही केले.

दंवडी देऊन   आवाहन

राजगावचे सरपंच अरविंद अहिरे पाटील यांच्या नेतृत्वात गावात स्वच्छ भारत, सुंदर भारत’चा संदेश देण्यासाठी चक्क्क दंवडी देण्यात आली. या दंवडीद्वारे गावकºयांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर पुणे येथे न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि राजगावातील मूळ रहिवासी पंढरी गोटे यांच्यासह विविध विभागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, भारतीय सैनिक, डॉक्टर, वकील आणि प्राध्यापक मंडळींनी यात सहभाग घेतला. 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान