शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

Washim Jilha Parihad : निधी दिला; पण खर्चाबाबत अस्पष्टता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:11 IST

कोरोनाच्या काळात अगोदरच जिल्ह्याला अपुरा निधी मिळत असल्याने आणि त्यातच मार्गदर्शनाअभावी ४.६६ कोटींचा निधी पडून राहत असल्याने विकासात्मक बाबींना खीळ बसत आहे.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : १५ व्या वित्त आयोगांतर्गत वाशिम जिल्हा परिषद व सहा पंचायत समित्यांना जून, जुलै महिन्यात दोन टप्प्यात एकूण ४.६६ कोटींचा निधी मिळाला. परंतू, हा निधी नेमक्या कोणत्या बाबींवर खर्च करावा, याबाबत केंद्र शासनाकडून कोणतेही मार्गदर्शन प्राप्त झाले नसल्याने, ४.६६ कोटींचा निधी जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त विभागात पडून आला. कोरोनाच्या काळात अगोदरच जिल्ह्याला अपुरा निधी मिळत असल्याने आणि त्यातच मार्गदर्शनाअभावी ४.६६ कोटींचा निधी पडून राहत असल्याने विकासात्मक बाबींना खीळ बसत आहे.ग्रामीण भागात विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी विविध योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींना निधी पुरविला जातो. १४ व्या वित्त आयोगांतर्गत यापूर्वी संपूर्ण निधी हा ग्रामपंचायतींच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत होता. यंदा १५ व्या वित्त आयोगांतर्गत यामध्ये थोडा बदल केला असून, ८० टक्के निधी हा ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषद व पंचायत समितींसाठी २० टक्के निधी राखीव ठेवण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषदेला १० टक्के आणि उर्वरीत १० टक्क्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वाटप, असे नियोजन आहे. केंद्र शासनाकडून १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषदेसाठी २.३३ कोटी आणि सहा पंचायत समित्यांसाठी २.३३ कोटी असा एकूण ४.६६ कोटींचा निधी २९ जून २०२० आणि २७ जुलै २०२० रोजी असा दोन टप्प्यात मिळाला. मात्र, हा निधी नेमक्या कोणत्या बाबींवर खर्च करावा, याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना केंद्र शासनातर्फे जिल्हा परिषद यंत्रणेला देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शनाअभावी ४.६६ कोटींचा निधी जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त विभागात पडून आहे. केंद्र शासनाचे मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर हा निधी नियोजित बाबींवर खर्च केला जाईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.

निधी अपुरा, विकास कामांना खीळकोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडत असल्याने अन्य योजनांच्या निधीला कात्री लावण्यात आली. ३३ टक्क्याच्या सूत्रानुसार निधी मिळत असल्याने विकासात्मक कामांना खीळ बसत आहे. गावातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी शेड निर्मिती, ग्रामीण रस्ते, जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा, आरोग्य केंद्र इमारत दुरूस्ती, ग्रामपंचायत भवन निर्मिती यासह ग्रामीण भागातील विकासात्मक कामे निकाली काढण्यासाठी शासनाकडून भरघोष निधीची अपेक्षा आहे. परंतू, कोरोनाच्या काळात पुरेशा प्रमाणात जिल्हा परिषदेला निधी मिळेल, याची तुर्तास तरी शाश्वती नाही. त्यातच १५ व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेला ४.६६ कोटींचा निधीही मार्गदर्शक सूचनांच्या कचाट्यात अडकल्याने पेच ंनिर्माण झाला.

१५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद व सहा पंचायत समित्या मिळून जवळपास ४.६६ कोटींचा निधी मिळाला. परंतू, हा निधी नेमका कशावर खर्च करावा याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मार्गदर्शन मागविले आहे. मार्गदर्शन प्राप्त होताच, नियोजनानुसार उपरोक्त निधी खर्च केला जाईल.- कालिदास तापीउपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद