शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

वाशिम:गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणात चुका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:34 IST

देपूळ : देपूळ परिसरात १३ व १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुका असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांचे कोरडवाहू क्षेत्र असतानाही बागायती दाखविण्यात आले तर काहींना पात्र असूनही डावलण्यात आले, तर काहींचे नुकसान प्रत्यक्ष जमिनीपेक्षाही जादा नोंदविण्यात आले. यासंदर्भात शनिवारी ११ शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देकोरडवाहू क्षेत्र दाखविले बागायती जादा नुकसान दाखविण्याचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ : देपूळ परिसरात १३ व १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुका असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांचे कोरडवाहू क्षेत्र असतानाही बागायती दाखविण्यात आले तर काहींना पात्र असूनही डावलण्यात आले, तर काहींचे नुकसान प्रत्यक्ष जमिनीपेक्षाही जादा नोंदविण्यात आले. यासंदर्भात शनिवारी ११ शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार नोंदविली.१३ व १४ फेब्रुवारी रोजी देपूळ परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, तूर, हरभरा, कांदा, आंबा, संत्रा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्या चमूमार्फत सर्वेक्षणही करण्यात आले. यामध्ये प्रत्यक्ष गहू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान झालेल्या २० ते २५ शेतकºयांना डावलण्यात आले असून, त्यांना अपात्र लाभार्थींच्या यादीत समाविष्ट केले. तर एकाच शेतकºयाचे नाव हे  गट नंबर एकच असताना, त्याच शेतकºयाच्या पिकांचे नुकसान हे वेगवेगळ्या क्षेत्रावर वेगवेगळे दाखविण्यात आल्याचा तसेच काही शेतकºयांच्या नावावर असलेल्या जमिनीपेक्षा जादा जमिनीचे नुकसान दाखविल्याची बाब देपूळ येथील ११ शेतकºयांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिली. दरम्यान, आमदार लखन मलीक यांनी महादेव ज्ञानबा वाघमारे व इतर ३ शेतकºयांच्या शेतातील प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली होती. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकाच्या चमूने नेमके या चारही शेतकºयांना सर्वेक्षणातून वगळले आहे. त्यामुळे शंका-कुशंकांना पेव फुटले असून, अक्षम्य चुका करणाºयांविरूद्ध ठोस कारवाई करावी, अशी मागणी ११ शेतकºयांनी केली. देपूळ गाव परिसरातील नुकसानाचे पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी एकमुखी मागणी केली.दरम्यान, विहीर, पाइपलाइन, वीज पुरवठा नसणारे तसेच सिंचित जमीन नसताना बागायती दाखविणाºया शेतकºयांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणीही शेतकºयांनी केली. पात्र लाभार्थ्यांना यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी महादेव वाघमारे यांच्यासह ११ शेतकºयांनी केली. शेतकºयांच्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. 

टॅग्स :washimवाशिम