शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

वाशिम:गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणात चुका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:34 IST

देपूळ : देपूळ परिसरात १३ व १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुका असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांचे कोरडवाहू क्षेत्र असतानाही बागायती दाखविण्यात आले तर काहींना पात्र असूनही डावलण्यात आले, तर काहींचे नुकसान प्रत्यक्ष जमिनीपेक्षाही जादा नोंदविण्यात आले. यासंदर्भात शनिवारी ११ शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार नोंदविली.

ठळक मुद्देकोरडवाहू क्षेत्र दाखविले बागायती जादा नुकसान दाखविण्याचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ : देपूळ परिसरात १३ व १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपीटग्रस्त भागाच्या सर्वेक्षणामध्ये अनेक चुका असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही शेतकºयांचे कोरडवाहू क्षेत्र असतानाही बागायती दाखविण्यात आले तर काहींना पात्र असूनही डावलण्यात आले, तर काहींचे नुकसान प्रत्यक्ष जमिनीपेक्षाही जादा नोंदविण्यात आले. यासंदर्भात शनिवारी ११ शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार नोंदविली.१३ व १४ फेब्रुवारी रोजी देपूळ परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, तूर, हरभरा, कांदा, आंबा, संत्रा, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्या चमूमार्फत सर्वेक्षणही करण्यात आले. यामध्ये प्रत्यक्ष गहू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान झालेल्या २० ते २५ शेतकºयांना डावलण्यात आले असून, त्यांना अपात्र लाभार्थींच्या यादीत समाविष्ट केले. तर एकाच शेतकºयाचे नाव हे  गट नंबर एकच असताना, त्याच शेतकºयाच्या पिकांचे नुकसान हे वेगवेगळ्या क्षेत्रावर वेगवेगळे दाखविण्यात आल्याचा तसेच काही शेतकºयांच्या नावावर असलेल्या जमिनीपेक्षा जादा जमिनीचे नुकसान दाखविल्याची बाब देपूळ येथील ११ शेतकºयांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाºयांच्या निदर्शनात आणून दिली. दरम्यान, आमदार लखन मलीक यांनी महादेव ज्ञानबा वाघमारे व इतर ३ शेतकºयांच्या शेतातील प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी केली होती. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकाच्या चमूने नेमके या चारही शेतकºयांना सर्वेक्षणातून वगळले आहे. त्यामुळे शंका-कुशंकांना पेव फुटले असून, अक्षम्य चुका करणाºयांविरूद्ध ठोस कारवाई करावी, अशी मागणी ११ शेतकºयांनी केली. देपूळ गाव परिसरातील नुकसानाचे पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी एकमुखी मागणी केली.दरम्यान, विहीर, पाइपलाइन, वीज पुरवठा नसणारे तसेच सिंचित जमीन नसताना बागायती दाखविणाºया शेतकºयांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणीही शेतकºयांनी केली. पात्र लाभार्थ्यांना यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी महादेव वाघमारे यांच्यासह ११ शेतकºयांनी केली. शेतकºयांच्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी केली जाईल, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. 

टॅग्स :washimवाशिम