शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

वाशिम: गारपिटीमुळे नुकसानाच्या पंचनामा कार्यवाहीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 17:26 IST

वाशिम: जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाकडून गारपिटीने झालेल्या नुकसानाच्या पंचनामे करण्याच्या कार्यवाहीची सद्यस्थितीविषयी माहिती घेतली. कार्यवाही पूर्ण होऊन एकत्रित अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व युद्धपातळीवर काम करून पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

 

वाशिम: जिल्ह्यात  ११ ते १३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठ्याा प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानाची दखल घेत शासनाने तातडीने मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकºयांना लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या.

पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाकडून गारपिटीने झालेल्या नुकसानाच्या पंचनामे करण्याच्या कार्यवाहीची सद्यस्थितीविषयी माहिती घेतली. जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या गारपिटीमुळे ३११ गावांमध्ये सुमारे २६ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, फळपिकांसह इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक बाधित गावांमध्ये जाऊन नुकसानाचे पंचनामे करत असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण होऊन एकत्रित अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना शासनाने तातडीने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत जाहीर केली आहे. ही मदत लवकरात लवकर शेतकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पंचनामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच नुकसानग्रस्त प्रत्येक पिकाचा पंचनाम्यात समावेश होईल, जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व युद्धपातळीवर काम करून पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमSanjay Rathodसंजय राठोडHailstormगारपीट