शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

वाशिम: गारपिटीमुळे नुकसानाच्या पंचनामा कार्यवाहीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 17:26 IST

वाशिम: जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाकडून गारपिटीने झालेल्या नुकसानाच्या पंचनामे करण्याच्या कार्यवाहीची सद्यस्थितीविषयी माहिती घेतली. कार्यवाही पूर्ण होऊन एकत्रित अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व युद्धपातळीवर काम करून पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

 

वाशिम: जिल्ह्यात  ११ ते १३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठ्याा प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानाची दखल घेत शासनाने तातडीने मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकºयांना लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या.

पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाकडून गारपिटीने झालेल्या नुकसानाच्या पंचनामे करण्याच्या कार्यवाहीची सद्यस्थितीविषयी माहिती घेतली. जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या गारपिटीमुळे ३११ गावांमध्ये सुमारे २६ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, फळपिकांसह इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक बाधित गावांमध्ये जाऊन नुकसानाचे पंचनामे करत असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण होऊन एकत्रित अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना शासनाने तातडीने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत जाहीर केली आहे. ही मदत लवकरात लवकर शेतकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पंचनामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच नुकसानग्रस्त प्रत्येक पिकाचा पंचनाम्यात समावेश होईल, जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व युद्धपातळीवर काम करून पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमSanjay Rathodसंजय राठोडHailstormगारपीट