शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम: गारपिटीमुळे नुकसानाच्या पंचनामा कार्यवाहीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 17:26 IST

वाशिम: जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाकडून गारपिटीने झालेल्या नुकसानाच्या पंचनामे करण्याच्या कार्यवाहीची सद्यस्थितीविषयी माहिती घेतली. कार्यवाही पूर्ण होऊन एकत्रित अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व युद्धपातळीवर काम करून पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

 

वाशिम: जिल्ह्यात  ११ ते १३ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठ्याा प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या नुकसानाची दखल घेत शासनाने तातडीने मदत जाहीर केली आहे. ही मदत शेतकºयांना लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या.

पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाकडून गारपिटीने झालेल्या नुकसानाच्या पंचनामे करण्याच्या कार्यवाहीची सद्यस्थितीविषयी माहिती घेतली. जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या गारपिटीमुळे ३११ गावांमध्ये सुमारे २६ हजार २८७ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहू, फळपिकांसह इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक बाधित गावांमध्ये जाऊन नुकसानाचे पंचनामे करत असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण होऊन एकत्रित अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना शासनाने तातडीने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत जाहीर केली आहे. ही मदत लवकरात लवकर शेतकºयांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पंचनामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच नुकसानग्रस्त प्रत्येक पिकाचा पंचनाम्यात समावेश होईल, जेणेकरून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व युद्धपातळीवर काम करून पंचनामे पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमSanjay Rathodसंजय राठोडHailstormगारपीट