शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाशिम : भीषण पाणी टंचाईतही भूगर्भाची चाळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:01 IST

वाशिम : पर्जन्यमानात होत असलेली घट, जलपुनर्भरणाचा अभाव, प्रमाणापेक्षा अधिक होणारा पाण्याचा उपसा यासह तत्सम कारणांमुळे जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना आणि महाराष्ट्र जलसंपदा नियमन व प्राधिकरणाने २०० फुटांपेक्षा अधिक खोलीवर कूपनलिका घेण्यासंबंधी निर्बंध लादूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यापेक्षा कितीतरी अधिक खोलीच्या कूपनलिका (बोअरवेल) घेतल्या जात आहेत. याकडे मात्र जिल्हा प्रशासन व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. 

ठळक मुद्देकूपनलिकांची खोदकामे सुरूच प्रशासनाचे नियंत्रण आवश्यक

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्जन्यमानात होत असलेली घट, जलपुनर्भरणाचा अभाव, प्रमाणापेक्षा अधिक होणारा पाण्याचा उपसा यासह तत्सम कारणांमुळे जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना आणि महाराष्ट्र जलसंपदा नियमन व प्राधिकरणाने २०० फुटांपेक्षा अधिक खोलीवर कूपनलिका घेण्यासंबंधी निर्बंध लादूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यापेक्षा कितीतरी अधिक खोलीच्या कूपनलिका (बोअरवेल) घेतल्या जात आहेत. याकडे मात्र जिल्हा प्रशासन व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन, प्रशासनाकडून विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात असताना भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, संरक्षित करणे आणि अमर्याद पाणी उपशावर बंदी घालणे अशक्य होत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील जलस्रोतांची पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खोलवर गेल्यामुळे हजारो विहिरी आणि पाण्यासाठी खोदलेल्या कूपनलिकाही जलपुनर्भरण न झाल्याने कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी यंदा पुन्हा कूपनलिका घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, जास्तीत जास्त २०० फूट कूपनलिका घेण्याचा दंडक असतानाही ४०० फूटांपेक्षा अधिकच खोदले जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे जिल्हा प्रशासन व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वेळीच लक्ष पुरवून त्यावर निर्बंध लादावे, असा सूर सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. 

जमिनीखालचे पाणी ही कुणाचीही व्यक्तिगत मालमत्ता नाही. त्यामुळे त्यावर कुणी अधिकार सांगत असेल, तर ती चुकीची बाब आहे. महाराष्ट्र जलसंपदा नियमन व प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमानुसारच जास्तीत जास्त २०० फूट खोलवर कूपनलिकांचे खोदकाम व्हायला हवे. मात्र, त्यापेक्षा अधिक खोलीच्या कूपनलिका घेतल्या जात असतील, तर नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे बिनदिक्कत तक्रार करावी. संबंधितांवर निश्चितपणे कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल. नगर परिषद, नगर पंचायती, ग्रामपंचायती यांनीही या प्रकाराकडे विशेषत्वाने लक्ष पुरवावे. तसे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले जातील.- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम