शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

वाशिम : खैरखेडावासियांची पाण्यासाठी पायपीट, प्रशासनातर्फे उपाययोजना शून्य   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 13:32 IST

मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून दूरवरून पाणी आणण्याची कसरत बच्चे कंपनीसह वयोवृद्ध नागरिकांना करावी लागत आहे.

राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून दूरवरून पाणी आणण्याची कसरत बच्चे कंपनीसह वयोवृद्ध नागरिकांना करावी लागत आहे. आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या खैरखेडा येथे एकही सार्वजनिक अथवा खासगी विहीर किंवा कुपनलिका नाही. गावाचा बहुतांश भूभाग हा डोंगर, द-या खो-याने व्यापलेला आहे. खडकाळ भाग असल्याने परिसरात जलस्त्रोत नाहीत. गावानजीक असलेल्या बेंदाडी नामक नदीच्या पात्रातील डोहावरून वापरायचे पाणी आणावे लागते तर गाव तलावाच्या भिंतीलगत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली जाते.

मात्र, नदी पात्रातील डोह हिवाळ्यातच कोरडेठण्ण पडतात तर गाव तलावातील जलसाठा संपत येताच विहिरीतील पाण्याचे पाझरही बंद पडतात. यामुळे गावक-यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. सद्यस्थितीत ब्रेक के बाद अपुरा जलसाठा येत असल्याने त्या पाण्यासाठी अबालवृद्धांना एक किमी अंतरावर घाटमाथ्याचा रस्ता चढून उन्हातान्हात पाणी आणावे लागत आहे. कायमस्वरुपी पाणी समस्या निकाली काढण्याचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. वनविभागाचे कचाट्यात अडकलेला गाव तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचा प्रश्न निकाली निघणे आवश्यक आहे.

या तलावाच्या भिंतीची उंची वाढल्यास साहजिकच तलावातील जलसाठ्यात वाढ होईल, यात शंका नाही. गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणून गावक-यांना तहान भागवावी लागत आहे. सुदी संग्राहक तलावावरून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गावक-यांनी केली.

टॅग्स :Waterपाणी