शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

वाशिम : खैरखेडावासियांची पाण्यासाठी पायपीट, प्रशासनातर्फे उपाययोजना शून्य   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 13:32 IST

मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून दूरवरून पाणी आणण्याची कसरत बच्चे कंपनीसह वयोवृद्ध नागरिकांना करावी लागत आहे.

राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून दूरवरून पाणी आणण्याची कसरत बच्चे कंपनीसह वयोवृद्ध नागरिकांना करावी लागत आहे. आदिवासीबहुल लोकवस्ती असलेल्या खैरखेडा येथे एकही सार्वजनिक अथवा खासगी विहीर किंवा कुपनलिका नाही. गावाचा बहुतांश भूभाग हा डोंगर, द-या खो-याने व्यापलेला आहे. खडकाळ भाग असल्याने परिसरात जलस्त्रोत नाहीत. गावानजीक असलेल्या बेंदाडी नामक नदीच्या पात्रातील डोहावरून वापरायचे पाणी आणावे लागते तर गाव तलावाच्या भिंतीलगत असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवर येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली जाते.

मात्र, नदी पात्रातील डोह हिवाळ्यातच कोरडेठण्ण पडतात तर गाव तलावातील जलसाठा संपत येताच विहिरीतील पाण्याचे पाझरही बंद पडतात. यामुळे गावक-यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. सद्यस्थितीत ब्रेक के बाद अपुरा जलसाठा येत असल्याने त्या पाण्यासाठी अबालवृद्धांना एक किमी अंतरावर घाटमाथ्याचा रस्ता चढून उन्हातान्हात पाणी आणावे लागत आहे. कायमस्वरुपी पाणी समस्या निकाली काढण्याचा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. वनविभागाचे कचाट्यात अडकलेला गाव तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचा प्रश्न निकाली निघणे आवश्यक आहे.

या तलावाच्या भिंतीची उंची वाढल्यास साहजिकच तलावातील जलसाठ्यात वाढ होईल, यात शंका नाही. गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या विहिरीवरून पाणी आणून गावक-यांना तहान भागवावी लागत आहे. सुदी संग्राहक तलावावरून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गावक-यांनी केली.

टॅग्स :Waterपाणी