शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम :  शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:09 IST

मारसुळ येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे सोयाबीनच्या सुडीची होळी केली व त्वरित मदत करण्याची मागणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयातील शेतातील उभे व काढणी केलेले सोयाबीन पीक, कापसासह फळ पिकांचे पावसामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मालेगाव तालुक्यातील मारसुळ येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे सोयाबीनच्या सुडीची होळी केली व त्वरित मदत करण्याची मागणी करण्यात आली. कारंजा तालुकयातील पानझीरा येथील शेतकºयांचे ५ लाखांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकºयांसह विविध संघटना पुढे आल्या आहेत. जिल्हयात नुकसानग्रस्त शेतकºयांकडून सूचना फॉर्म भरुन घेणे सुरु असून जिल्हयात ९० हजाराच्या जवळपास फॉर्म भरण्यात आले असून यामध्ये एकटया कारंजा तालुक्यातील २१ हजार शेतकºयांनी अर्ज भरले आहेत.कारंजा : तालुक्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकºयांच्या हाता-तोंडासी आलेला सोयाबीनचा घास वाया गेला आहे. शेतकºयांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधित विभागामार्फत वैयक्तीक स्तरावर नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात येणार आहेत. याकरिता शेतकºयांना प्रधानमंत्री पिकविमा योजनेचा सूचना फॉर्म भरावा लागणार आहे. व तो पिकविमा कंपनीच्या संकेतस्थळावर पाठवून त्याची प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावी लागणार आहे. या अनुषंगाने कारंजा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सूचना फॉर्म घेण्यास २९ आॅक्टोंबरपासून सुरूवात झाली. २९ व ३० आॅक्टोंबर या दोन दिवसांत सदर कार्यालयात जवळपास २० हजार ११७ शेतकºयांनी सूचना फॉर्म भरून दिले. यासाठी पिकविमा कंपनीच्यावतीने समन्वयक म्हणून मंगेश घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तीन दिवसांत सूचना फॉर्म देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पिकविमा कंपनीच्या मते नुकसान झाल्यानंतर ४८ तासाच्या आत नुकसानीच्या माहिती पिकविमा कंपनीला कळविणे बंधनकारक आहे. परंतु हे सूचना फॉर्म सादर करतांना त्यासाठी लागणाºया कागदपत्रांच्या जमवाजमवीसाठी शेतकºयांची दमछाक होत आहे. एकीकडे शेतकरºयांनी वैयक्तिक स्वरूपात काढलेला विमा व बँकेमार्फत काढलेला विमा यांचे प्रस्ताव यापुर्वीच विमा कंपनीकडे आॅनलाईन पध्दतीने सादर करण्यात आले आहे. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाऊस सुरू असल्याचे देखील पावसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. एवढे सगळे उघड्या डोळ्यांनी दिसूनही सूचना फॉर्म भरण्याचा हा घाट विमा कंपनीने घातल्याने शेतकºयांना आपले कामधंदे सोडून तसेच वेळ, श्रम व पैसा खर्चून हा सूचना फॉर्म दाखल करावा लागत आहे. एवढे करूनही विमा कंपनी नुकसान भरपाईचे निकष काय लावते हे कोणालाच माहित नाही. तरीही नुकसान भरपाई मिळेल या आशेने कारंजा तालुक्यातील २० हजार शेतकºयांनी सूचना फॉर्म दाखल केले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे.

रयत क्रांती संघटनेचे निवेदन मानोरा : मानोरा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकºयांना शेत जमीनीचे सात पंचनामे करुन सरसकट नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष हर्षल देशमुख यांनी तहसीलदार यांना ३१ आॅक्टोबर रोजी निवेदन दिले .निवेदनात म्हटले की, शेतातील सोंगुन ठेवलेले सोयाबीन जाग्यावरच सडले तर शेतात लावलेल्या सोयाबीनच्या पाणी शिरल्याने सोयाबीनला कोम फुटले . शिवाय फळ बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सरसकट एकरी दहा हजार रुपये प्रमाणे तात्काळ शेतकºयांना देण्यात यावे व शेतकरी शेतमजूर यांना दहा किलो गहु, तांदुळ साखर स्वस्त धान्य ुदकानातुन देण्यात यावी असे म्हटले आहे. निवेदन तहसील कार्यालयामार्फत तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर वैभव पाचकवडे, प्रशांत भगत, अजय घाडगे, खडसे ,अजय ठोंबरे, आदिच्या स्वाक्षºया आहेत.

जाचक अट रद्द करण्याची मागणीशेतकºयांना सूचना फॉर्म पिकविमा कंपनीच्या संकेतस्थळावर आॅनलाईन पाठवून त्याची एक प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात देण्याची अट असून याकरिता सातबारा लागतो. सातबारा काढतांना सर्व्हर डाऊन असल्यास शेतकºयांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती