शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

वाशिम जिल्ह्यात पावसाअभावी १३ टक्के क्षेत्रावरील पेरणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 12:09 IST

Agriculture News : पाऊस झाल्याशिवाय पेरणीची कामे हाती घ्यायची नाही, या मानसिकतेत काही शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामात पेरणीलायक क्षेत्र एकूण ४ लाख ६२ हजार हेक्टर आहे. त्यापैकी २८ जूनअखेर ३ लाख ५३ हजार हेक्टरवर आतापर्यंत विविध पिकांची पेरणी झाली आहे; तर पावसाअभावी १३ टक्के क्षेत्रावरील पेरणी खोळंबली आहे. दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरणीची कामे हाती घ्यायची नाही, या मानसिकतेत काही शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीन पेऱ्याला सर्वाधिक प्राधान्य दिलेले आहे. सोयाबीनचे सरासरी पेरी क्षेत्र ३ लाख ४ हजार हेक्टर असून २८ जूनपर्यंत २ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याचे प्रमाण ९२ टक्के आहे. यापाठोपाठ तूर ५१६ हेक्टरवर (९४ टक्के) आणि कापूसची १८० हेक्टरवर (९४ टक्के) पेरणी आटोपली आहे. खरीप ज्वारी, मुंग, उडिद, ऊस आदी पिकांचा पेरा ३० ते ३५ टक्क्यांच्या आसपास आहे. दरम्यान, दमदार पाऊस आल्याशिवाय पेरणीची कामे हाती घ्यायची नाही, असा निर्धार काही शेतकऱ्यांनी केला असल्याने अद्याप  जिल्ह्यातील १३ टक्के क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी झाली नसल्याचे एकंदरित चित्र आहे. 

जिल्ह्यात अद्यापपर्यंत सर्वदूर तथा सार्वत्रिक स्वरूपाचा दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे यापुर्वी पेरणीची घाई केलेल्या काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीला तोंड द्यावे लागत आहे. हे प्रमाण अत्यल्प असले तरी परिस्थिती लक्षात घेता उर्वरित १३ टक्के शेतकऱ्यांनी दमदार पाऊस होऊन जमिनीत अपेक्षित ओल निर्माण झाल्याशिवाय पेरणी करू नये.- शंकर तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीagricultureशेती