शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाशिम जिल्ह्यात १ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 13:29 IST

वाशिम :  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ र्पंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले. 

ठळक मुद्दे शांतता कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे हा गुन्हा ठरणार आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी, सामाजिक सण, लग्न सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.

वाशिम :  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ र्पंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले. 

आगामी सण, उत्सव, यात्रा लक्षात घेता जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच शांतता कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने १ एप्रिल २०१८ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. १ एप्रिलपर्यंत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे हा गुन्हा ठरणार आहे. तसेच कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, वाद्य वाजविणे, किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा, धार्मिकविधी, सामाजिक सण, लग्न सोहळे यांना हा आदेश लागू नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले. तसेच उपविभागीय अधिकारी यांना या आदेशामधून समोचित प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये स्थानिक पोलीस अधिकाºयांशी सल्लामसलत करून सूट देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत.

पोहरादेवी येथील मंदिर परिसरात बोकड बळी देण्यास बंदी

 मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व उमरी खुर्द येथे २६ मार्च २०१८ या रोजी बंजारा समाज बांधवांची यात्रा भरते.  या यात्रेमध्ये बोकड बळी देवून नवस फेडण्याची प्रथा आहे. मात्र न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार जगदंबा मंदिरासमोर बोकडबळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली आहे. यात्रेमध्ये बोकडबळी प्रथेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होवू नये, याकरिता फौजदार प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पोहरादेवी येथील जगदंबा देवीच्या यात्रेमध्ये मुख्य मंदिराचे मंडप वा त्या लगतच्या ५०० मीटर यात्रा परिसरात २२ मार्च ते २६ मार्च २०१८ या कालावधीत बोकडबळी देण्यावर, सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांच्या कत्तलीवर निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी दिले.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार