शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वाशिम जिल्ह्यात ४० मीमी पाऊस; शिरपूर-भेरा रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:52 IST

जिल्हयात ११ जून सायंकाळी ६ ते १२ जूनला सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ३९.३८ मीमी पावसाची नोंद झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात ११ जून सायंकाळी ६ ते १२ जूनला सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ३९.३८ मीमी पावसाची नोंद झाली असून, रिसोड ते मालेगाव या महामार्गालगत नालीची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरचे सर्व पाणी शेतात घुसले. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संंबंधित कंत्राटदारांनी आतापासूनच पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी शेतकऱ्यांनी १२ जून रोजी केली.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना वेग देत पेरणीसाठी जमिन सज्ज ठेवली. १० जूनपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. दुसरीकडे काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस नसल्याने त्या ठिकाणच्या शेतकºयांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी १२ जून रोजी केले.१० जून रोजी दुपारी तसेच रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस झाला. ११ जूनला सायंकाळी वाशिमसह मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, मानोरा तालुक्यात बºयापैकी पाऊस झाला. १२ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्हयात सरासरी ३९.३८ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक पाऊस मालेगाव तालुक्यात ६८.३० मीमी झाला. सर्वात कमी पाऊस मानोरा तालुक्यात ११.७८ मीमी झाला. रिसोड तालुक्यात ५३.१३ मीमी, कारंजा तालुक्यात ३५.५० मीमी, मंगरूळपीर तालुक्यात ३९.१४ मीमी पाऊस झाला. सर्वत्र दूरवर पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. जेथे जमिनीमध्ये चार इंच ओलावा आहे, तेथे पेरणी सुरू होण्याची चिन्हे आहेत.दरम्यान, ४६१ बी क्रमांकाचा मालेगाव, शिरपूर, रिसोड, हिंगोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने ११ जूनच्या रात्री जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकºयांच्या शेतात पाणी घुसले. शेतात पाणी घुसणार नाही, अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची मागणी शेतकºयांनी केली.भेरा रस्ता बंद !शिरपूर ते भेरा या मार्गादरम्यान एका नाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. ११ जून रोजी सायंकाळी तसेच रात्रीच्या सुमारास दमदार पाऊस झाल्याने पुलाचे काम प्रभावित झाले तसेच पर्यायी रस्ता चिखलमय झाला. त्यामुळे या दरम्यानची वाहतूक १२ जून रोजी ठप्प होती. यामुळे शिरपूर ते भेरा या मार्गाने प्रवास करणाºया वाहतूकदारांची चांगलीच गैरसोय झाल्याचे दिसून आले.

पेरणीची घाई नकोमहसूल मंडळाच्या पर्जन्यमापकाच्या नोंदीमध्ये जरी समाधानकारक पाऊस झालेला दिसत असला तरी शेतकºयांनी त्यांचे संबंधित गावामध्ये ७५ मीमी असा समाधानकारक पाऊस झाल्याची खातरजमा करावी. जमीनीमध्ये चार इंच ओलावा झाल्याची खात्री करुन प्रत्येक शेतकºयांनी पेरणीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.११ जूनच्या रात्रीदरम्यान बºयापैकी पाऊस झाला. जेथे जमिनीमध्ये चार इंच ओलावा आहे, ७५ मिमी असा समाधानकारक पाऊस झाल्याची खातरजमा केल्यानंतरच शेतकºयांनी पेरणी करावी. जेथे ४ इंच ओलावा नाही, तेथे सध्याच पेरणीची सुरूवात करू नये.-एस.एम. तोटावार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस