शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या ९० टक्के पर्जन्यमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 12:41 IST

वाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले

ठळक मुद्दे यावर्षी जिल्ह्यातील मध्यम व लघू अशा १३१ प्रकल्पांपैकी ७० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले. कारंजा आणि मानोरा या दोन तालुक्यांमधील सुमारे १४ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना जबर फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७९८ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र आॅगस्ट संपण्यापूर्वीच अर्थात २४ तारखेपर्यंत ७२४.७६ (९०.७४ टक्के) पर्जन्यमान झाले. यामुळे जिल्ह्यातील ७० सिंचन प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले असून दोन तालुक्यांमधील काही गावांचा अपवाद वगळता अन्य चार तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील पीक परिस्थितीही समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.प्राप्त माहितीनुसार, जून ते सप्टेंबर अशा चार महिन्याच्या कालावधीत वाशिम तालुक्यात ९११.६० मिलीमिटर, मालेगाव ८३९.९०, रिसोड ७५०.७०, मंगरूळपीर ७७८.९०, मानोरा ७६०.३० आणि कारंजा तालुक्यात ७५०.८० असे एकूण ४७९२ मिलीमिटर पाऊस कोसळतो. त्याची सरासरी ७९८.७० मिलीमिटर असते. यंदा मात्र आॅगस्ट महिना संपण्यापूर्वीच ४३४८ मिलीमिटर अर्थात सरासरी ७२४.७६ मिलीमिटर पाऊस झाला आहे. दरम्यान, समाधानकारक पावसामुळे यावर्षी जिल्ह्यातील मध्यम व लघू अशा १३१ प्रकल्पांपैकी ७० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले असून आगामी रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी या पाण्याचा अपेक्षित फायदा होणार असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे. यावर्षीच्या जोरदार पावसामुळे मध्यंतरी उद्भवलेल्या पीक परिस्थितीमुळे कारंजा आणि मानोरा या दोन तालुक्यांमधील सुमारे १४ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना जबर फटका बसला. हा अपवाद वगळता अन्य चार तालुक्यांमधील पिकांना पाऊस पोषक ठरला असून यंदा विक्रमी उत्पन्न मिळण्याची आशा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमDamधरणmonsoon 2018मान्सून 2018