शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाऊलवाट रुतली चिखलात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 14:52 IST

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या शंभरावर पांदन रस्त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी असलेल्या शंभरावर पांदन रस्त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. ओबडधोबड स्वरूपात असलेल्या या रस्त्यांवर सद्य:स्थितीत पावसाच्या पाण्याचे डबके आणि चिखल साचल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे दरवर्षीच पावसाळ्यात हा प्रश्न उद्भवत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी पालकमंत्री पाणंद, शेत रस्ते योजना जाहीर केली. आवश्यक असलेली यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी आणि पिकलेला शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या दर्जाच्या शेतरस्त्यांची गरज आहे. विशेषत: पावसाळ्यात पेरणी, मळणी, कापणी व इतर कामे यंत्रांमार्फत केली जातात. या यंत्रसामग्रीची वाहतूक करण्यासाठी पांदन रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील शंभरपेक्षा अधिक ठिकाणच्या पांदन रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर सर्वत्र पावसाच्या पाण्याचे डबके साचण्यासह चिखल निर्माण झाल्याने त्यातून मार्गक्रमण करणे शेतकºयांना अशक्य होत आहे.असे असताना अतिक्रमणात अडकलेले पांदन रस्ते मोकळे करणे, गौणखनिज वापरून अशा रस्त्यांची किमान डागडूजी करणे किंवा शक्य असेल त्याठिकाणी चांगल्या दर्जाचे पांदन रस्ते तयार करण्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. यामुळे शेतकºयांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी