शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

नैसर्गिक आपत्तीच्या आर्थिक मदतीतून वाशिम जिल्हा वगळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:20 IST

नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शासनाने शेतकºयांना १९ जुलै रोजी आर्थिक मदत जाहीर केली असून, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही शेतकºयाचा समावेश करण्यात आलेला नाही. 

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकºयांंना मदत करण्याचे आदेश निर्गमित केले आणि यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून निधीची मागणी करण्यात आली होती.आयुक्तांकडून आलेल्या निधीतून नुकसानग्रस्त शेतकºयांना ५१५ कोटी, २४ लाख, ७ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.महसूल आणि कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार या दोन्ही जिल्ह्यांत एकाही हेक्टरवर ३३ टक्केही नुकसान झाले नसल्याचे शासनाकडून मंजूर झालेल्या मदतीवरून स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात २०१६ मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचा प्रशासनाकडून सर्वे करण्यात आला. यामध्ये वाशिम जिल्ह्याचाही समावेश होता. आता या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शासनाने शेतकºयांना १९ जुलै रोजी आर्थिक मदत जाहीर केली असून, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही शेतकºयाचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्यात २०१६ मध्ये एप्रिल, मे व नोव्हेंबर २०१६ आणि जून ते आॅक्टोबर २०१६ या कालावधित अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले होते. या पीक नुकसानीचा सर्वे कृषी व महसूल विभागाकडून करण्यात आला आणि त्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्या अहवालावरुन शासनाने ९ जानेवारी २०१७ आणि २३ मे २०१७ रोजीच्या निर्णयाद्वारे नुकसानग्रस्त शेतकºयांंना मदत करण्याचे आदेश निर्गमित केले आणि यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून निधीची मागणी करण्यात आली होती. आता सर्व विभागीय आयुक्तांकडून आलेल्या निधीतून नुकसानग्रस्त शेतकºयांना ५१५ कोटी, २४ लाख, ७ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाºयांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकºयांनाच ही मदत मिळणार असून, ही मदत थेट संबंधित नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार आहे. या अंतर्गत अमरावती विभागाकडून प्राप्त अहवालाच्या आधारे यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील मिळून ३९ हजार ६५५ शेतकºयांना ७ कोटी ९९ लाख ४० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार विभागातील उपरोक्त तीन जिल्ह्यांतील १६ हजार ३०३ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले होते. प्रत्यक्षात विभागातील अकोला आणि वाशिम जिल्ह्यातही उपरोक्त कालावधित नैसर्गिक आपत्तीने हजारो शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता; परंतु महसूल आणि कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार या दोन्ही जिल्ह्यांत एकाही हेक्टरवर ३३ टक्केही नुकसान झाले नसल्याचे शासनाकडून मंजूर झालेल्या मदतीवरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी