शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

नैसर्गिक आपत्तीच्या आर्थिक मदतीतून वाशिम जिल्हा वगळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:20 IST

नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शासनाने शेतकºयांना १९ जुलै रोजी आर्थिक मदत जाहीर केली असून, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही शेतकºयाचा समावेश करण्यात आलेला नाही. 

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकºयांंना मदत करण्याचे आदेश निर्गमित केले आणि यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून निधीची मागणी करण्यात आली होती.आयुक्तांकडून आलेल्या निधीतून नुकसानग्रस्त शेतकºयांना ५१५ कोटी, २४ लाख, ७ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे.महसूल आणि कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार या दोन्ही जिल्ह्यांत एकाही हेक्टरवर ३३ टक्केही नुकसान झाले नसल्याचे शासनाकडून मंजूर झालेल्या मदतीवरून स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्यात २०१६ मध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचा प्रशासनाकडून सर्वे करण्यात आला. यामध्ये वाशिम जिल्ह्याचाही समावेश होता. आता या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी शासनाने शेतकºयांना १९ जुलै रोजी आर्थिक मदत जाहीर केली असून, त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकाही शेतकºयाचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्यात २०१६ मध्ये एप्रिल, मे व नोव्हेंबर २०१६ आणि जून ते आॅक्टोबर २०१६ या कालावधित अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले होते. या पीक नुकसानीचा सर्वे कृषी व महसूल विभागाकडून करण्यात आला आणि त्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला. त्या अहवालावरुन शासनाने ९ जानेवारी २०१७ आणि २३ मे २०१७ रोजीच्या निर्णयाद्वारे नुकसानग्रस्त शेतकºयांंना मदत करण्याचे आदेश निर्गमित केले आणि यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून निधीची मागणी करण्यात आली होती. आता सर्व विभागीय आयुक्तांकडून आलेल्या निधीतून नुकसानग्रस्त शेतकºयांना ५१५ कोटी, २४ लाख, ७ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाºयांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकºयांनाच ही मदत मिळणार असून, ही मदत थेट संबंधित नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार आहे. या अंतर्गत अमरावती विभागाकडून प्राप्त अहवालाच्या आधारे यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील मिळून ३९ हजार ६५५ शेतकºयांना ७ कोटी ९९ लाख ४० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार विभागातील उपरोक्त तीन जिल्ह्यांतील १६ हजार ३०३ हेक्टर क्षेत्रावर ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाले होते. प्रत्यक्षात विभागातील अकोला आणि वाशिम जिल्ह्यातही उपरोक्त कालावधित नैसर्गिक आपत्तीने हजारो शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता; परंतु महसूल आणि कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार या दोन्ही जिल्ह्यांत एकाही हेक्टरवर ३३ टक्केही नुकसान झाले नसल्याचे शासनाकडून मंजूर झालेल्या मदतीवरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी