शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

वाशिम जिल्ह्यात स्मार्ट ग्राम निवडीसाठी मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:19 IST

स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात तालुका स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे. तथापि, यासाठी वारंवार तारखेत बदल करूनही ही प्रक्रिया अद्याप पार पाडता आली नाही.पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात 'इको व्हिलेज' ही योजना शासनाने बंद करीत नव्या स्वरूपात 'स्मार्ट ग्राम'ही योजना साकारली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत तालुकास्तरावर निवडीसाठी ग्रामपंचायतींना नमुद निकषानुसार स्व-मुल्यांकन करून गुणांकन देण्यात येते. या योजनेत सहभाग घेवू इच्छिणाच्या संबंधित ग्रामपंचायती स्व-मुल्यांकन करून त्यांचे प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयांस पाठवतात. प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या एकूण स्व-मुल्यांकन प्रस्तावांपैकी अधिक गुण प्राप्त २५ टक्के ग्रामपंचायतीची तालुका तपासणी समिती तपासणी करुन त्यांना गुणांकन देते. तालुकास्तरावरील सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीची तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड करून ती ग्रामपंचायत जिल्हा स्तरावरील द्वितीय स्पर्धेकरीता पात्र ठरते. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २०१८-१९ साठी सहा तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.या मानोरा तालुक्यातील गिरोली, कारंजा तालुक्यातील विळेगाव, मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, वाशिम तालुक्यातील काटा, रिसोड तालुक्यातील बिबखेडा आणि मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींचे पुर्नमुल्यांकन करून जिल्हा स्मार्ट ग्राम निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्मार्ट ग्राम तपासणी समितीचे अध्यक्ष यांनी जिल्हा तपासणी समितीचे सदस्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग, तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. वाशिम यांना सुचित केले. त्यानंतर ३१ मे रोजी पूर्व नियोजित तपासणीची तारिख बदलून सहा ग्रामपंचायतींसाठी गिरोली आणि विळेगावसाठी १ जुन, सायखेडा, काटासाठी ४ जून, तर बिबखेडा आणि ढोरखेडासाठी ६ जून २०१९ ची तारिख निश्चित करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतींनी तयारीही केली; परंतु या तारखेत ७ आॅगस्ट रोजी बदल करून गिरोली, विळेगाव आणि सायखेडा ११ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी १२ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. त्यापूर्वीच ९ आॅगस्ट रोजी पुन्हा पुनर्मुल्यांकनासाठी तपासणीच्या तारखेत बदल करून गिरोली, विळेगाव आणि सायखेडा १३ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी १४ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. या तारखेलाही तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे मुल्यांकन करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींनी तपासणीसाठी केलेली तयारी व्यर्थ ठरली आहे.दोन महिन्यांत तीन वेळा तारखांत बदलतालुकास्तरावर स्मार्ट ग्राम योजनेत प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींतून जिल्हा स्तर स्मार्ट ग्राम निवडीसाठी पुनर्मुल्यांकनाच्या तारखेत दोन महिन्यांत तीन वेळा बदल करण्यात आला. त्यामुळे तालुकास्तरावर प्रथम आलेल्या स्मार्ट ग्रामपंचायतींनी पुनर्मुल्यांकनासाठी केलेली तयारी व्यर्थ ठरली आहे. पुनर्मुल्यांकनाच्या तारखेत वारंवार होणाऱ्या बदलामुळे तालुकास्तर स्मार्ट ग्रामपंचायतीतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ही प्रक्रिया तातडीने पार पाडली जावी, अशी अपेक्षा संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य व गावकरी मंडळीकडून व्यक्त होत आहे.

जिल्हास्तर स्मार्ट ग्रामनिवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामच्या पुनर्मुल्यांक नाची प्रक्रिया काही कारणांमुळे प्रलंबित ठेवावी लागली. तथापि, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण पार पाडण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सुचना संबंधित सहा ग्रामपंचायतींना देण्यात येतील.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना