शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात स्मार्ट ग्राम निवडीसाठी मुहूर्त मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 14:19 IST

स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात तालुका स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे. तथापि, यासाठी वारंवार तारखेत बदल करूनही ही प्रक्रिया अद्याप पार पाडता आली नाही.पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात 'इको व्हिलेज' ही योजना शासनाने बंद करीत नव्या स्वरूपात 'स्मार्ट ग्राम'ही योजना साकारली आहे. स्मार्ट ग्राम योजनेत तालुकास्तरावर निवडीसाठी ग्रामपंचायतींना नमुद निकषानुसार स्व-मुल्यांकन करून गुणांकन देण्यात येते. या योजनेत सहभाग घेवू इच्छिणाच्या संबंधित ग्रामपंचायती स्व-मुल्यांकन करून त्यांचे प्रस्ताव संबंधित पंचायत समिती कार्यालयांस पाठवतात. प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या एकूण स्व-मुल्यांकन प्रस्तावांपैकी अधिक गुण प्राप्त २५ टक्के ग्रामपंचायतीची तालुका तपासणी समिती तपासणी करुन त्यांना गुणांकन देते. तालुकास्तरावरील सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतीची तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवड करून ती ग्रामपंचायत जिल्हा स्तरावरील द्वितीय स्पर्धेकरीता पात्र ठरते. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २०१८-१९ साठी सहा तालुक्यातील ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.या मानोरा तालुक्यातील गिरोली, कारंजा तालुक्यातील विळेगाव, मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, वाशिम तालुक्यातील काटा, रिसोड तालुक्यातील बिबखेडा आणि मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींचे पुर्नमुल्यांकन करून जिल्हा स्मार्ट ग्राम निवडण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्मार्ट ग्राम तपासणी समितीचे अध्यक्ष यांनी जिल्हा तपासणी समितीचे सदस्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग, तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. वाशिम यांना सुचित केले. त्यानंतर ३१ मे रोजी पूर्व नियोजित तपासणीची तारिख बदलून सहा ग्रामपंचायतींसाठी गिरोली आणि विळेगावसाठी १ जुन, सायखेडा, काटासाठी ४ जून, तर बिबखेडा आणि ढोरखेडासाठी ६ जून २०१९ ची तारिख निश्चित करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतींनी तयारीही केली; परंतु या तारखेत ७ आॅगस्ट रोजी बदल करून गिरोली, विळेगाव आणि सायखेडा ११ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी १२ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. त्यापूर्वीच ९ आॅगस्ट रोजी पुन्हा पुनर्मुल्यांकनासाठी तपासणीच्या तारखेत बदल करून गिरोली, विळेगाव आणि सायखेडा १३ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी १४ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. या तारखेलाही तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे मुल्यांकन करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींनी तपासणीसाठी केलेली तयारी व्यर्थ ठरली आहे.दोन महिन्यांत तीन वेळा तारखांत बदलतालुकास्तरावर स्मार्ट ग्राम योजनेत प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींतून जिल्हा स्तर स्मार्ट ग्राम निवडीसाठी पुनर्मुल्यांकनाच्या तारखेत दोन महिन्यांत तीन वेळा बदल करण्यात आला. त्यामुळे तालुकास्तरावर प्रथम आलेल्या स्मार्ट ग्रामपंचायतींनी पुनर्मुल्यांकनासाठी केलेली तयारी व्यर्थ ठरली आहे. पुनर्मुल्यांकनाच्या तारखेत वारंवार होणाऱ्या बदलामुळे तालुकास्तर स्मार्ट ग्रामपंचायतीतही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ही प्रक्रिया तातडीने पार पाडली जावी, अशी अपेक्षा संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य व गावकरी मंडळीकडून व्यक्त होत आहे.

जिल्हास्तर स्मार्ट ग्रामनिवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामच्या पुनर्मुल्यांक नाची प्रक्रिया काही कारणांमुळे प्रलंबित ठेवावी लागली. तथापि, लवकरच ही प्रक्रिया पूर्ण पार पाडण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सुचना संबंधित सहा ग्रामपंचायतींना देण्यात येतील.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना