शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रब्बीसाठी वाशिम जिल्ह्यास पीकविमा कंपनी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 14:58 IST

राज्यातील वाशिमसह १४ जिल्ह्यांसाठी एकाही विमा कंपनीने निविदा भरली नाही.

ठळक मुद्देरब्बी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत २४ दिवसावर आली आहे.१४ जिल्ह्यांसाठी एकाही विमा कंपनीने निविदा भरली नाही.पीक विम्याची जोखीम पत्करण्यास कोणतीही कंपनी तयार झालेली नाही.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत २४ दिवसावर आली आहे. तथापि, वाशिम जिल्ह्यात पीकविम्याची जबाबदारी स्विकारण्यास एकही कंपनी तयार नाही. आता शेतकरी ही योजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन निवेदन सादर करीत आहेत.राज्यात खरीप हंगाम २०१६ पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत असून, राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना रब्बी हंगाम २०१९-२० मध्ये राबविण्यास शासनाने २८ नोव्हेंबरच्या शासन निर्णयान्वये मंजुरीही दिली आहे. तथापि, राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यात अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविणे आवश्यक असल्याने यासाठी विमा कंपन्यांडून निविदा मागविण्यात आल्या त्यात अहमदनगर, नांदेड, बुलडाणा, सातारा, यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि., पुणे, परभणी, अकोला, सांगली, नागपूर, वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी भारती एक्सा जनरल इन्शूरन्स कंपनी, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार ,रायगड या सहा जिल्ह्यांसाठी बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, तर उस्मानाबाद, नाशिक, कोल्हापूर, गोंदिया आणि अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनीने निविदा भरून जबाबदारी घेतली आहे. तथापि, राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी वाशिमसह बीड, लातूर, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी (सिंधदुर्ग) मुंबई, भंडारा, चंद्र्रपूर, गडचिरोली, सोलापूर या १४ जिल्ह्यांसाठी एकाही विमा कंपनीने निविदा भरली नाही. अर्थात या १४ जिल्ह्यातील पीक विम्याची जोखीम पत्करण्यास कोणतीही कंपनी तयार झालेली नाही.परिणामी, या १४ जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील पीकविम्याच्या संरक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात निवेदन सादर करून रब्बी पीकविमा योजना राबविण्याची मागणी करीत आहेत.भारतीय कृषी पीकविमा कंपनीचाही निर्णय नाहीकोणत्याही खासगी कंपनीने राज्यातील वाशिमसह १४ जिल्ह्यांत रब्बी पीकविम्याची जोखीम पत्करण्याची तयारी दर्शविली नसताना आता शासनाच्या कृषीविमा कंपनीकडे ही जबाबदारी सोपविणे आवश्यक आहे. तथापि, पीक विमा भरण्यास सुरुवात झाली असताना आणि ही मुदत ३१ डिसेंबर असल्याने आता शेतकºयांकडे २४ दिवस उरले असतानाही या संदर्भात शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष या संदर्भातील निर्णय घेतल्यानंतर शेतकºयांना पीक विमा भरण्यास किती वेळ मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

वाशिमसह इतर काही जिल्ह्यात कोणत्याही कंपनीने रब्बी पीकविम्याच्या जबाबदारीसाठी निविदा भरलेल्या नाहीत. या संदर्भात शासनस्तरावर निर्णय होणे अपेक्षीत आहे. शासनाच्या कृषीविमा कंपनीकडे ही जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता असून, शेतकºयांना रब्बी पीकविमा भरण्यास मुदतवाढही दिली जाऊ शकते. तथापि, याबाबत शासन निर्णयानंतरच सर्व स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता निश्चित काही सांगता येणार नाही.-एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीवाशिम

केंद्र व राज्य सरकार पीक विमा योजनेसाठी शेतकºयांना प्रोत्साहित करते. तर वाशिम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठी मात्र अद्यापही वाशिम जिल्ह्यात शेतकºयांना पीक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध झाली नाही. यासंदर्भात कृषी अधिकाºयांशी संपर्क साधला असता, या योजनेसाठी वाशिम जिल्ह्यात कोणतीच कंपनी तयार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकाºयांना यासंदर्भात निवेदन सादर करून शेतकºयांची समस्या मांडली आहे.- लक्ष्मण जोगदंडशेतकरी, मसोला ता. मालेगाव

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी