शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशिम जिल्हा : स्वच्छता मिशनच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:10 IST

वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा हागणदरीमूक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची धडपड सुरू आहे.

ठळक मुद्दे जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग शौचालयांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिवाचे रान करीत आहे.आजवर जिल्ह्यातील केवळ कारंजा तालुका हागणदरीमूक्त करण्यात प्रशासनाला यश आले. येत्या २५ जानेवारीपर्यंत मंगरुळपीर तालुका हागणदरीमूक्त करण्याचे कठोर निर्देश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी संंबंधितांना दिले आहेत.

वाशिम: स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा हागणदरीमूक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाची धडपड सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत सहा तालुक्यांपैकी केवळ एक तालुका हागणदरीमूक्त झाला असून, येत्या २५ जानेवारीपर्यंत दुसरा तालुका हागणदरीमूक्त करण्याचे निर्देश जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रशासनाला दिलेले आहेत.

वाशिम जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग शौचालयांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिवाचे रान करीत आहे; परंतु अद्यापही त्यांना म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही. आजवर जिल्ह्यातील केवळ कारंजा तालुका हागणदरीमूक्त करण्यात प्रशासनाला यश आले असून, आता येत्या २५ जानेवारीपर्यंत मंगरुळपीर तालुका हागणदरीमूक्त करण्याचे कठोर निर्देश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी संंबंधितांना दिले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शौचालयांचे उद्ष्टि पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या मार्गदर्शनात विविध उपाययोजना, जनजागृती, गृहभेटी, कुटूंबस्तर संवाद कार्यक्रम घेण्यासह गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग पथकांद्वारे उघड्यावरील शौचवारी रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना बव्हंशी यश मिळाले असले तरी, शौचालयांची उद्दिष्टपूर्ती होऊ शकलेली नाही. सद्यस्थितीत कारंजा तालुक्यातील शौचालयांची उद्दिष्टपूर्ती होऊन हा तालुका हागणदरीमूक्त घोषीत करण्यात आला आहे. त्यानंतर स्वच्छता मिशन कक्षाने मंगरुळपीर तालुक्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींपैकी ७० ग्रामपंचायती हागणदरीमूक्त झाल्या, अर्थात या ग्रामपंचायतींनी शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता उर्वरित दोन ग्रामपंचायतींमधील शौचालयांची कामे अंतिम टप्प्यात असून, ती येत्या तीन दिवसांत पूर्ण क रण्याचे आव्हान लाभार्थींबरोबरच प्रशासनापुढेही आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतरच २६ जानेवारी रोजी मंगरुळपीर तालुका हागणदरीमूक्त घोषीत करता येणार आहे. त्यामुळे मंगरुळपीर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन कक्षाकडून या तालुक्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान