शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाशिम जिल्ह्यात मोजणीविना २९ हजार शेतकऱ्यांची तूर पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 15:02 IST

वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्याची मुदत १५ मे रोजी संपली असून, अद्याप जवळपास २९ हजार शेतकऱ्यांच्या तूरीची मोजणी व खरेदी बाकी आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण ४१ हजार ५८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत ४१ हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास १२ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली.अंतिम मुदत संपल्यामुळे उर्वरीत २९ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी होणार नाही.

वाशिम : किमान आधारभूत किंमतीनुसार नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी करण्याची मुदत १५ मे रोजी संपली असून, अद्याप जवळपास २९ हजार शेतकऱ्यांच्या तूरीची मोजणी व खरेदी बाकी आहे. या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासनाने तूर खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य स्वप्नील सरनाईक यांनी  जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे १५ मे रोजी केली.

वाशिम जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला  फटका बसला.  केंद्र सरकारने तूरीला किमान आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये निश्चित केली आहे. मात्र, बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दराने तूरीची खरेदी होत असल्याने जिल्ह्यात नाफेडचे पाच खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ४१ हजार ५८ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. १८ एप्रिल रोजी नाफेडची तूर खरेदी बंद केली होती. त्यानंतर १५ मे पर्यंत तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत ४१ हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास १२ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. अंतिम मुदत संपल्यामुळे उर्वरीत २९ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी होणार नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांवर एकप्रकारे अन्याय झाला आहे. बाजार समित्यांमध्ये तूरीला ३८०० ते ४२०० रुपयाच्या दरम्यान भाव आहेत. हमीभावापेक्षा तब्बल १२०० ते १५०० रुपयाने कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. त्यामुळे शासनाने नाफेडच्या तूर खरेदीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरनाईक यांनी मंगळवारी केली. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी