शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदानसंदर्भात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 18:34 IST

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच कडधान्य व राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत बिजोत्पादन करणाºया शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी रविवार, १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात चर्चा केली. शासनदरबारी हा प्रश्न मांडून अनुदानाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही आमदार पाटणी यांनी शेतकºयांना दिली.

ठळक मुद्देशेतक-यांनी घेतली आमदार पाटणी यांची भेट प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच कडधान्य व राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियानांतर्गत बिजोत्पादन करणाºया शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना बियाणे उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळण्यासंदर्भात शेतकºयांनी रविवार, १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या जनसंपर्क कार्यालयात चर्चा केली. शासनदरबारी हा प्रश्न मांडून अनुदानाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही आमदार पाटणी यांनी शेतकºयांना दिली.शेतक-यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाला चालना देण्यासाठी विविध शासकीय योजनेंतर्गत मूग, उडीद, तूर, हरभरा व सोयाबीन या पिकांच्या बियाणे उत्पादनास सहाय्य व बियाणे वितरण या बाबींसाठी गत काही वर्षांपासून शासनाकडून अनुदान दिले जाते. १७ मे २०१७ च्या आदेशानुसार शेतकरी उत्पादक गट, कंपन्या, मंडळे यांना बियाणे उत्पादन व वितरण या प्रणालीतून वगळले आहे. मात्र, सन २०१६-१७ या वर्षात बियाणे उत्पादन प्रक्रिया सुरू केलेल्या शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांना २०१७ च्या हंगामात बियाणे उत्पादन व वितरण या बाबींचे अनुदान मिळणे क्रमप्राप्त आहे, हा मुद्दा घेऊन जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अनुदान मिळण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. बियाणे उत्पादनाची प्रक्रिया ही एका वर्षाअगोदर सुरू होते. सन २०१६-१७ मध्ये बिजोत्पादन केलेले बियाणे सन २०१७-१८ मध्ये तयार झाले आहे. त्यामुळे सन २०१७-१८ मध्ये तयार झालेले बियाण्यासाठीसुद्धा कृषी विभागामार्फत शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उत्पादन व वितरणाचे अनुदान मिळावे, अशी मागणी उत्पादक गटाच्या शेतकºयांनी केली. लाखो रुपयांचे कर्ज काढून बियाणे उत्पादन प्रक्रियेत शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांनी पाऊल टाकले आहे. शासनाच्या हा निर्णय येण्यापूर्वीच सन २०१६-१७ मध्ये शेतकºयांनी बियाणे उत्पादन प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळे किमान २०१६-१७ या वर्षामध्ये सुरू केलेल्या बियाणे उत्पादन प्रक्रियेंतर्गतच्या बियाणे उत्पादन व वितरण या बाबीला अनुदान देण्याची मागणी शेतकºयांनी केलेली आहे. यासंदर्भात १७ डिसेंबर रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्याशी पंजाबराव अवचार, रवींद्र बोडखे, गजानन अवचार, शिवाजी भारती यांच्यासह अन्य शेतकºयांनी चर्चा केली. २०१६-१७ मध्ये खरिप व रब्बी हंगामातील बियाणे उत्पादन प्रक्रियेंतर्गतचे उत्पादन व वितरण अनुदान मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी शेतकºयांनी आमदार पाटणी यांच्याकडे केली. हा मुद्दा शासनस्तरावर मांडून अनुदानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, अशी ग्वाही राजेंद्र पाटणी यांनी शेतकºयांना दिली. 

टॅग्स :washimवाशिमRajendra Patniराजेंद्र पाटणी