शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

वाशिमच्या ‘सदानंद’ची स्वच्छता जनजागृतीसाठी ‘वाशिम ते दिल्ली’ वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:18 IST

गाडगेबाबांच्या वेशभूषेत  स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने  वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  वाशिम : स्वत: हलाखीचे जीवन जगून दुसºयासाठी काहीतरी करण्याची जिद्द असलेले कमीच. परंतु वाशिम शहरातील सदानंद गजानन तायडे हा युवक त्यापासून अपवाद आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाचे धडे  देणाºया या ध्येयवेडा या युवकाने चक्क आता गाडगेबाबांच्या वेशभूषेत  स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने  वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे. यापूर्वीही स्वच्छतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहचविण्यासाठी पंढरपूर यात्रेदरम्यान तेथे जावून स्वच्छता करुन जनजागृती केली होती.वाशिम येथील रहिवासी सदानंद गजानन तायडे हा कॉलेज जिवनापासूनच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. स्वच्छतेबाबत आगळे-वेगळे उपक्रम राबवून त्याने राज्यात आपले नावलौकीक केले आहे. पंढरपूर यात्रेत गाडगेबाबांची वेशभूषा करीत संपूर्ण रस्ते झाडण्याच्या कार्यापासून तर अंधश्रध्दा निर्मूलन, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, मतदार जनजागृतीसह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा जणू विडाच उचलला. आता तर त्याने चक्क स्वच्छता जनजागृतीबाबत दिल्लीपर्यंत सायकलवारी सुरु केली. या रॅलीमध्ये सदानंद ज्या गावात मुक्काम करेल त्या गावाची संपूर्ण आधी स्वच्छता करेल व नंतर त्या गावात पोटासाठी अन्न व ग्रामपंचायत, आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपले मुक्काम करुन पुढचा प्रवास करणार आहे. १० जानेवारीपासून मराठवाडयातील तसेच वाशिमपासून जवळच असलेले गोरेगाव येथील आपल्या शेतामधून सकाळी १० वाजता सुरुवात केली. तेथून सदानंदने आपले गाव वाशिमातून पुढचा प्रवास सुरु केला आहे. आपला देश स्वच्छ व सुंदर रहावा याकरिता आपण प्रयत्न करीत आहे. आधि गावपातळीवर नंतर शहर पातळीवर आपण मोठया प्रमाणात स्वच्छता अभियान व त्याबाबत जनजागृती केली. आता थेट दिल्लीपर्यंत जावून रस्त्यात लागणाºया सर्व गावांना भेटी देवून जनजागृती करणार आहे. हे करताना मिळणारे आत्मिक समाधान औरच आहे. मी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना झोपडपट्टीत जावून शिक्षण दिले. आज मी दिलेले शिक्षण कितपत कामी आले याकरिता पुन्हा तेथे जावून पाहिले असता ती मुले खळखळ वाचून दाखवित आहेत. त्यापेक्षा त्यांच्या पालकांकडून माणण्यात येत असलेले आभार शब्दात सांगता येत नाहीत.- सदानंद तायडे, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान