शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

वाशिमच्या ‘सदानंद’ची स्वच्छता जनजागृतीसाठी ‘वाशिम ते दिल्ली’ वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:18 IST

गाडगेबाबांच्या वेशभूषेत  स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने  वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  वाशिम : स्वत: हलाखीचे जीवन जगून दुसºयासाठी काहीतरी करण्याची जिद्द असलेले कमीच. परंतु वाशिम शहरातील सदानंद गजानन तायडे हा युवक त्यापासून अपवाद आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाचे धडे  देणाºया या ध्येयवेडा या युवकाने चक्क आता गाडगेबाबांच्या वेशभूषेत  स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रध्देबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम ते दिल्ली सायकलने  वारी १० जानेवारीपासून सुरु केली आहे. यापूर्वीही स्वच्छतेचा संदेश भाविकांपर्यंत पोहचविण्यासाठी पंढरपूर यात्रेदरम्यान तेथे जावून स्वच्छता करुन जनजागृती केली होती.वाशिम येथील रहिवासी सदानंद गजानन तायडे हा कॉलेज जिवनापासूनच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. स्वच्छतेबाबत आगळे-वेगळे उपक्रम राबवून त्याने राज्यात आपले नावलौकीक केले आहे. पंढरपूर यात्रेत गाडगेबाबांची वेशभूषा करीत संपूर्ण रस्ते झाडण्याच्या कार्यापासून तर अंधश्रध्दा निर्मूलन, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, मतदार जनजागृतीसह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा जणू विडाच उचलला. आता तर त्याने चक्क स्वच्छता जनजागृतीबाबत दिल्लीपर्यंत सायकलवारी सुरु केली. या रॅलीमध्ये सदानंद ज्या गावात मुक्काम करेल त्या गावाची संपूर्ण आधी स्वच्छता करेल व नंतर त्या गावात पोटासाठी अन्न व ग्रामपंचायत, आश्रमशाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपले मुक्काम करुन पुढचा प्रवास करणार आहे. १० जानेवारीपासून मराठवाडयातील तसेच वाशिमपासून जवळच असलेले गोरेगाव येथील आपल्या शेतामधून सकाळी १० वाजता सुरुवात केली. तेथून सदानंदने आपले गाव वाशिमातून पुढचा प्रवास सुरु केला आहे. आपला देश स्वच्छ व सुंदर रहावा याकरिता आपण प्रयत्न करीत आहे. आधि गावपातळीवर नंतर शहर पातळीवर आपण मोठया प्रमाणात स्वच्छता अभियान व त्याबाबत जनजागृती केली. आता थेट दिल्लीपर्यंत जावून रस्त्यात लागणाºया सर्व गावांना भेटी देवून जनजागृती करणार आहे. हे करताना मिळणारे आत्मिक समाधान औरच आहे. मी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना झोपडपट्टीत जावून शिक्षण दिले. आज मी दिलेले शिक्षण कितपत कामी आले याकरिता पुन्हा तेथे जावून पाहिले असता ती मुले खळखळ वाचून दाखवित आहेत. त्यापेक्षा त्यांच्या पालकांकडून माणण्यात येत असलेले आभार शब्दात सांगता येत नाहीत.- सदानंद तायडे, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान