शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

वाशिम : हजारो हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा तडाखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:54 IST

वाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देयुद्धपातळीवर पंचनामे येत्या आठवड्यात अहवाल तयार होण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे.जिल्हय़ात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ८५0९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. रविवारनंतर सोमवारी कारंजा तालुक्यात गारपीट झाली. त्यानंतर १३ फेब्रुवारीला कारंजा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. मानोरा तालुक्यातील रूईगोस्ता परिसरात झालेल्या गारपिटीने फळबागा व गहू, हरभरा  आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील गोवर्धन, पार्डी तिखे, आसेगाव, येवती, रिठद, चिंचाबापेन, दापुरा, किनखेडा, पळसखेडा, वाडी रायताळ, मसलापेन आदी परिसराला गारपिटीने झोडपून काढल्याने शेकडो हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तलाठी, कृषी सहायक,  ग्रामसेवक यांच्या चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असून, येत्या आठवड्यात अंतिम अहवाल तयार होण्याचा अंदाज आहे.मालेगाव तालुक्यातील मुंगळा, शिरपूर, राजुरा परिसरातील गहू, हरभरा यासह संत्रा व फळबागेचे अतोनात नुकसान झाले असून, पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, याचा प्राथमिक अंदाज येत्या दोन दिवसात सांगता येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वाशिम तालुक्यातील अनसिंग, वारा जहागीर, देपूळ, उमरा शमशोद्दीन, बोरी, धानोरा मापारी, दगडउमरा यासह अन्य ठिकाणी गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने १६00 ते १८00 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मंगरूळपीर तालुक्यातही पंचनामे केले जात आहे. रविवारी झालेल्या गारपिटीपेक्षा मंगळवारच्या गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले असून, येत्या दोन-तीन दिवसांत प्राथमिक अंदाज समोर येईल तसेच येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. 

टॅग्स :washimवाशिम