शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

वाशिम : हजारो हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा तडाखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:54 IST

वाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देयुद्धपातळीवर पंचनामे येत्या आठवड्यात अहवाल तयार होण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज प्रशासनातर्फे वर्तविला जात आहे.जिल्हय़ात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील ८५0९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. रविवारनंतर सोमवारी कारंजा तालुक्यात गारपीट झाली. त्यानंतर १३ फेब्रुवारीला कारंजा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. मानोरा तालुक्यातील रूईगोस्ता परिसरात झालेल्या गारपिटीने फळबागा व गहू, हरभरा  आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील गोवर्धन, पार्डी तिखे, आसेगाव, येवती, रिठद, चिंचाबापेन, दापुरा, किनखेडा, पळसखेडा, वाडी रायताळ, मसलापेन आदी परिसराला गारपिटीने झोडपून काढल्याने शेकडो हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तलाठी, कृषी सहायक,  ग्रामसेवक यांच्या चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू असून, येत्या आठवड्यात अंतिम अहवाल तयार होण्याचा अंदाज आहे.मालेगाव तालुक्यातील मुंगळा, शिरपूर, राजुरा परिसरातील गहू, हरभरा यासह संत्रा व फळबागेचे अतोनात नुकसान झाले असून, पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, याचा प्राथमिक अंदाज येत्या दोन दिवसात सांगता येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. वाशिम तालुक्यातील अनसिंग, वारा जहागीर, देपूळ, उमरा शमशोद्दीन, बोरी, धानोरा मापारी, दगडउमरा यासह अन्य ठिकाणी गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने १६00 ते १८00 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मंगरूळपीर तालुक्यातही पंचनामे केले जात आहे. रविवारी झालेल्या गारपिटीपेक्षा मंगळवारच्या गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान झाले असून, येत्या दोन-तीन दिवसांत प्राथमिक अंदाज समोर येईल तसेच येत्या आठवड्यात पंचनामे पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. 

टॅग्स :washimवाशिम