शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वाशिम :  २३ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 17:41 IST

८६ परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांचा वॉच : प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार लोकमत न्यूज नेटवर्क  वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक ...

ठळक मुद्देएकूण २३,२७१ विद्यार्थी हे ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार. शिक्षण विभागाकडून एकूण १२ भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत.आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या.

८६ परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांचा वॉच : प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणारलोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाºया माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या वार्षिक परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. एकूण २३,२७१ विद्यार्थी हे ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा देणार असून, गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. दहावीची वार्षिक परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख तसेच मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यात आल्या. जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवरील कॉपी प्रकरणे लक्षात घेता जिल्हा प्रशासन तसेच शिक्षण विभागाकडून एकूण १२ भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या. जिल्ह्यात दहावीच्या वार्षिक परीक्षेला एकूण २३ हजार २७१ विद्यार्थी बसणार असून, यामध्ये नियमित २०९२२ तर रिपिटर २३४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ८६ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात परीक्षा कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. 

 प्रतिबंधात्मक आदेशगैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी इयत्ता दहावी परीक्षा होणाºया सर्व परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात परीक्षा कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहेत. परीक्षा केंद्रांवर ओळखपत्राशिवाय कुणालाही प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले अधिकारी वगळता इतर इसमांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.  

दहावीच्या परीक्षेला ३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. एकूण ८६ परीक्षा केंद्र असून, १२ भरारी पथके राहणार आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनीदेखील परीक्षा केंद्र संचालकांना सहकार्य करावे. विद्यार्थ्यांनीदेखील परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार, कॉपी आढळून आल्यास संबंधित परीक्षार्थीविरूद्ध कारवाई केली जाईल. - तानाजी नरळेशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षा