शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : २.५० लाख शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:22 IST

एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांना बसला आहे. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले असून, या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. दरम्यान, पीक नुकसानाच्या पंचनाम्यांची पुर्नपडताळणी केली जात आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसाने थैमान घालत पिकांचे अतोनात नुकसान केले. या नुकसानाची पाहणी कृषी व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली. या पाहणीनंतर प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ७९५ गावातील २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रात पीक नुकसान झाल्याचे दिसल. त्यानंतर प्रशासनाने या पंचनाम्याची पडताळणी व ‘डाटा एन्ट्री’ची प्रकिया पूर्ण केली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून, या नुकसानाचा फटका २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला आहे. त्यात जिरायत, बागायत आणि फळपिकांचाही समावेश आहे. आता या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाने अहवाल तयार केला आहे. त्या अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांचे वितरण करावे लागणार आहे.दरम्यान, कोणताही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये म्हणून प्रशासनाच्यावतीने पंचनाम्यांची पुर्नपडताळणीही करण्यात येत आहे. तथापि, ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक सुधारणाही अहवालात केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. अडचणी सापडलेल्या शेतकºयांकडून मदत तत्काळ जाहीर करण्याची मागणीजिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तयार करून ‘डाटा एन्ट्री’ प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. असे असले तरी रब्बी हंगाम सुरू झाला असताना आणि शेतकºयांना पैशांची नितांत गरज भासत असताना नुकसान भरपाईची मदत अद्यापपर्यंत शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली नाही. यासंदर्भात शासन निर्णयदेखील अद्यापपर्यंत निघाला नाही. यामुळे शेतकरी पुरते संभ्रमात सापडले आहेत. तथापि, शासनाने शेतकºयांची हलाखीची स्थिती लक्षात घेऊन तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून जोर धरत आहे. या विषयाकडे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही विशेष लक्ष पुरविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी