शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : २.५० लाख शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:22 IST

एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांना बसला आहे. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले असून, या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. दरम्यान, पीक नुकसानाच्या पंचनाम्यांची पुर्नपडताळणी केली जात आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसाने थैमान घालत पिकांचे अतोनात नुकसान केले. या नुकसानाची पाहणी कृषी व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली. या पाहणीनंतर प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ७९५ गावातील २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रात पीक नुकसान झाल्याचे दिसल. त्यानंतर प्रशासनाने या पंचनाम्याची पडताळणी व ‘डाटा एन्ट्री’ची प्रकिया पूर्ण केली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून, या नुकसानाचा फटका २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला आहे. त्यात जिरायत, बागायत आणि फळपिकांचाही समावेश आहे. आता या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाने अहवाल तयार केला आहे. त्या अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांचे वितरण करावे लागणार आहे.दरम्यान, कोणताही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये म्हणून प्रशासनाच्यावतीने पंचनाम्यांची पुर्नपडताळणीही करण्यात येत आहे. तथापि, ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक सुधारणाही अहवालात केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. अडचणी सापडलेल्या शेतकºयांकडून मदत तत्काळ जाहीर करण्याची मागणीजिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तयार करून ‘डाटा एन्ट्री’ प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. असे असले तरी रब्बी हंगाम सुरू झाला असताना आणि शेतकºयांना पैशांची नितांत गरज भासत असताना नुकसान भरपाईची मदत अद्यापपर्यंत शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली नाही. यासंदर्भात शासन निर्णयदेखील अद्यापपर्यंत निघाला नाही. यामुळे शेतकरी पुरते संभ्रमात सापडले आहेत. तथापि, शासनाने शेतकºयांची हलाखीची स्थिती लक्षात घेऊन तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून जोर धरत आहे. या विषयाकडे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही विशेष लक्ष पुरविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी