शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

वाशिम : २.५० लाख शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:22 IST

एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांना बसला आहे. एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले असून, या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. दरम्यान, पीक नुकसानाच्या पंचनाम्यांची पुर्नपडताळणी केली जात आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसाने थैमान घालत पिकांचे अतोनात नुकसान केले. या नुकसानाची पाहणी कृषी व महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या केली. या पाहणीनंतर प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात ७९५ गावातील २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रात पीक नुकसान झाल्याचे दिसल. त्यानंतर प्रशासनाने या पंचनाम्याची पडताळणी व ‘डाटा एन्ट्री’ची प्रकिया पूर्ण केली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून, या नुकसानाचा फटका २ लाख ५० हजार ३५० शेतकºयांना बसला आहे. त्यात जिरायत, बागायत आणि फळपिकांचाही समावेश आहे. आता या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाने अहवाल तयार केला आहे. त्या अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांचे वितरण करावे लागणार आहे.दरम्यान, कोणताही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये म्हणून प्रशासनाच्यावतीने पंचनाम्यांची पुर्नपडताळणीही करण्यात येत आहे. तथापि, ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक सुधारणाही अहवालात केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. अडचणी सापडलेल्या शेतकºयांकडून मदत तत्काळ जाहीर करण्याची मागणीजिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे तयार करून ‘डाटा एन्ट्री’ प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. असे असले तरी रब्बी हंगाम सुरू झाला असताना आणि शेतकºयांना पैशांची नितांत गरज भासत असताना नुकसान भरपाईची मदत अद्यापपर्यंत शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली नाही. यासंदर्भात शासन निर्णयदेखील अद्यापपर्यंत निघाला नाही. यामुळे शेतकरी पुरते संभ्रमात सापडले आहेत. तथापि, शासनाने शेतकºयांची हलाखीची स्थिती लक्षात घेऊन तत्काळ आर्थिक मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधून जोर धरत आहे. या विषयाकडे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही विशेष लक्ष पुरविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी