शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाशिम :  २.५ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:41 IST

जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यभरातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे तथा दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार, २१ डिसेंबर रोजी विधानसभेत केली. या निर्णयामुळे शासनाच्या निकषानुसार वाशिम जिल्ह्यातील सुमारे २ लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या ९० हजार शेतकºयांसह कर्ज पुनर्गठण झालेले तथा जुन्या कर्जमाफी योजनेतील लाभ न मिळालेल्या सुमारे १ लाख ६० हजार शेतकºयांनाही कर्जमाफी मिळणार आहे. त्यानुसार, कर्जमाफीचा हा आकडा सुमारे ५०० कोटीपर्यंत जाईल, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली.आॅक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस यासह गत काही महिन्यांमध्ये सातत्याने उद्भवणाºया नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचला आहे. या पृष्ठभुमिवर महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. कर्जमाफीच्या प्रक्रियेची सुरूवात ही मार्च २०२० या महिन्यापासून होणार आहे. कर्जमाफीचे पैसे शेतकºयांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तसेच कर्जाचे हप्ते नियमित भरणाºया शेतकºयांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल, अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली.दरम्यान, आज जाहीर झालेल्या निर्णयास अनुसरून शासनाच्या निकषानुसार वाशिम जिल्ह्यातील २०१४-१५ पासून थकबाकीदार असलेल्या ९० हजार शेतकºयांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळण्यासोबतच कर्ज पुनर्गठण आणि यापूर्वी शासनस्तरावरून जाहीर झालेल्या कर्जमाफीस पात्र ठरलेले; परंतु अद्यापपर्यंत कर्ज माफ न झालेल्या शेतकºयांनाही लाभ दिला जाणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले.

विधानसभेत शनिवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शासनाच्या निकषानुसार ८० ते ९० हजार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यासह कर्ज पुनर्गठण आणि जुन्या कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकºयांनाही पीक कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे.- रमेश कटकेजिल्हा उपनिबंधक, सह. संस्था

 

टॅग्स :washimवाशिमCrop Loanपीक कर्ज