शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

२६ जानेवारीपासून वारकऱ्यांतर्फे स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:00 IST

वाशिम : समाजातील अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरांवर आघात करुन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय आता प्रबोधनाच्या माध्यमातुन २६ जानेवारीपासून गावोगावी स्वच्छतेचा जागर करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजातील अंध्दश्रध्दा, अनिष्ठ रुढी परंपरांवर आघात करुन समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी अग्रेसर असलेला वारकरी संप्रदाय आता प्रबोधनाच्या माध्यमातुन २६ जानेवारीपासून गावोगावी स्वच्छतेचा जागर करणार आहे. त्यानुसार  जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायाचे प्रवचनकार, कीर्तनकार आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाची पूर्वतयारी बैठक १५ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या कै. वसंतराव नाईक सभागृहात पार पडली.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अतिरक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, वारकरी सेवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष  ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज, वाशिम  जिल्हा वारकरी सांप्रदाय अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर सरकटे महाराज, ह.भ.प. शिवशंकर भोयर महाराज, ह.भ.प. अजय महाजन महाराज यांची उपस्थिती होती. २६ जानेवारीपासून १० फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील निवडक ३० ते ४० वारकरी प्रत्येक गावात जाऊन स्वच्छतेबाबत प्रबोधन करणार आहेत. वारकरी साहित्य परिषदे मार्फतच सदर वारकºयांची निवड केली असून, बैठकीत याबाबतच्या सुचना देण्यात आल्या. यावेळी ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज म्हणाले की, कायद्याने समाजात बदल होत नाहीत त्यासाठी लोकांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे. गावातील स्वच्छतेबरोबरच वारकरी हे लोकांच्या अंत:करणाची स्वच्छता करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हयातुन आलेल्या वारकºयांना सोन्नर महाराज यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे म्हणाले की वाशिम जिल्हा परिषदेने सुरुवातीपासुनच स्वच्छतेच्या चळवळीत गुरुदेव सेवा मंडळ आणि वारकरी यांना सहभागी करुन घेतले आहे. ‘तुझं गावच नाही का तीर्थ’ ही मोहिम राबवुन स्वच्छता दिंडी, शौचालय नसलेल्या कुटुंबाच्या घरी जाऊन टाळनाद करण्याचे कार्यक्रम घेतले. यापुढील काळातही शौचालयाचा शंभर टक्के वापर होण्यासाठी जिल्हयात परत एकदा वारकरी संप्रदायाची मदत घेण्यात येणार असल्याचे कापडे यांनी सांगितले.या माध्यमातून शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, गावातील स्वच्छता सुविधांची देखभाल व दुरुस्ती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ओला व  सुका कचरा व्यवस्थापन, शौचालय वापराची सवय व  प्लास्टिक वापर बंदी या प्रमुख बाबींवर वारकरी गावात प्रबोधन  करणार आहेत. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर सरकटे महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल काळे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना