शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बियाण्यांबाबत महाबीजच्या निर्णयाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:46 IST

कृषी विभागाने पाठविला अहवाल : वीस दिवसानंतरही चौकशी नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीन बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाल्यानंतर कृषी विभागाने ३० जून रोजी संबंधित तालुका अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानाचा अहवाल मागविला. सदर अहवालाचे परीक्षण करून ते पुढील कार्यवाहीसाठी महाबीजकडे पाठविण्यात आले आहे; परंतु अद्याप या प्रकरणी महाबीजकडून चौकशी करून निर्णय घेण्यात आलेला नाही.यंदाच्या खरीप हंगामात पेरणीसाठी महाबीजकडून घेतलेले बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी रिसोड, मानोरा आणि मालेगाव तालुक्यातून प्राप्त झाल्या होत्या. या प्रश्नावर जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात २८ जून रोजी पार पडलेल्या सभेत मोठे वादंग झाले होते. या सभेत जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी महाबीज बियाण्याची रिकामी बॅग परिधान करून सभागृहाचे लक्ष वेधून घेत मानोरा तालुक्यातील न उगविलेल्या महाबीजच्या बियाण्याचा मुद्दा उपस्थित केला. मानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे पेरले; मात्र बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे दुबार पेरणीची वेळ आल्याच्या तक्रारी ३३ शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. या संदर्भात मागणी करूनही कृषी विभागाच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केली नसल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत असल्याने घटनास्थळाची पाहणी करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी रोकडे यांनी केली होती. या मुद्याला अन्य जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दुजोरा दिला. सदस्यांची मागणी लक्षात घेऊन सभेच्या पिठासीन अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख देशमुख यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी दोन दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने परिस्थितीची पाहणी करून उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर केला. यावेळी बियाण्यांची उगवणक्षमता खूपच कमी असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भातील अहवाल कृषी विभागाच्यावतीने महाबीजच्या विभागीय व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला. आता या अहवालाची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बियाण्यांची भरपाई देणे किंवा पेरणीची वेळ निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे शेत रिकामे राहिल्याने त्यांच्या मागणीनुसार नुकसानभरपाई द्यायची, याबाबत महाबीजला निर्णय घ्यायचा आहे. तथापि, अद्याप त्यांच्याकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. मानोरा तालुक्यातील परिस्थितीची पुन्हा पाहणी करणारमानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा पेरलेले महाबीजचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यानंतर या संदर्भात तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्यावतीने वरिष्ठांच्या निर्देशानुसार पाहणी करून आपला अहवाल जिल्हास्तरावर सादर के ला. त्यानंतर या अहवालानुसार जिल्हास्तरावरून महाबीजकडे कार्यवाहीसाठी पत्रही पाठविण्यात आले. तथापि, याबाबत अद्याप कोणताच निर्णय न झाल्याने जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे यांनी कृषी विकास अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांना दखल घेण्याची मागणी केली. त्यानुसार मानोरा तालुक्यातील संबंधित शेतावर भेट देऊन पाहणी करण्यात येणार असून, आमचे अधिकारी ही कार्यवाही करतील, अस कृषी विभागाने सांगितले.पीक प्रात्यक्षिकासाठी पुरविलेले बियाणेही निकृष्टकृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियान २०१७-१८ अंतर्गत प्रात्यक्षिक या घटकांतर्गत महाबिजमार्फत सोयाबीनचे बियाणे प्रात्यक्षिकांतर्गत निवड केलेल्या वाशिम तालुक्यातील ब्राह्मणवाडा, पांगरखेडा, वाघोली, कोकलगाव, कारली, सोनखास, केकतउमरा या गावांतील २५ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. या बियांण्यांचे उगवण कमी झाल्याचे उपरोक्त गावांतील शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार सदर समितीने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सदर बियाण्यांचे उगवण केवळ १५ ते २० टक्के झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले होते. या संदर्भातील अहवालही कृषी विभागाने पाठविला आहे.बियाणे उगविले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आमच्या विभागाकडून पाहणी करून वरिष्ठांमार्फत महाबीजकडे अहवाल सादर केला आहे. याबाबत महाबीजने अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांचा मोबदला द्यायचा की शेत रिकामे राहिल्याची भरपाई द्यायची, हा निर्णयसुद्धा त्यांच्या अखत्यारीतील आहे. - नरेंद्र बारापत्रेकृषी विकास अधिकारी,