शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

‘त्या’ बियाण्यांबाबत महाबीजच्या निर्णयाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:46 IST

कृषी विभागाने पाठविला अहवाल : वीस दिवसानंतरही चौकशी नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीन बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाल्यानंतर कृषी विभागाने ३० जून रोजी संबंधित तालुका अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानाचा अहवाल मागविला. सदर अहवालाचे परीक्षण करून ते पुढील कार्यवाहीसाठी महाबीजकडे पाठविण्यात आले आहे; परंतु अद्याप या प्रकरणी महाबीजकडून चौकशी करून निर्णय घेण्यात आलेला नाही.यंदाच्या खरीप हंगामात पेरणीसाठी महाबीजकडून घेतलेले बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी रिसोड, मानोरा आणि मालेगाव तालुक्यातून प्राप्त झाल्या होत्या. या प्रश्नावर जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात २८ जून रोजी पार पडलेल्या सभेत मोठे वादंग झाले होते. या सभेत जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी महाबीज बियाण्याची रिकामी बॅग परिधान करून सभागृहाचे लक्ष वेधून घेत मानोरा तालुक्यातील न उगविलेल्या महाबीजच्या बियाण्याचा मुद्दा उपस्थित केला. मानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे पेरले; मात्र बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे दुबार पेरणीची वेळ आल्याच्या तक्रारी ३३ शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. या संदर्भात मागणी करूनही कृषी विभागाच्या चमूने घटनास्थळाची पाहणी केली नसल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत असल्याने घटनास्थळाची पाहणी करण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी रोकडे यांनी केली होती. या मुद्याला अन्य जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दुजोरा दिला. सदस्यांची मागणी लक्षात घेऊन सभेच्या पिठासीन अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख देशमुख यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी दोन दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने परिस्थितीची पाहणी करून उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर केला. यावेळी बियाण्यांची उगवणक्षमता खूपच कमी असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भातील अहवाल कृषी विभागाच्यावतीने महाबीजच्या विभागीय व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला. आता या अहवालाची पाहणी करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बियाण्यांची भरपाई देणे किंवा पेरणीची वेळ निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे शेत रिकामे राहिल्याने त्यांच्या मागणीनुसार नुकसानभरपाई द्यायची, याबाबत महाबीजला निर्णय घ्यायचा आहे. तथापि, अद्याप त्यांच्याकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. मानोरा तालुक्यातील परिस्थितीची पुन्हा पाहणी करणारमानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा पेरलेले महाबीजचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यानंतर या संदर्भात तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्यावतीने वरिष्ठांच्या निर्देशानुसार पाहणी करून आपला अहवाल जिल्हास्तरावर सादर के ला. त्यानंतर या अहवालानुसार जिल्हास्तरावरून महाबीजकडे कार्यवाहीसाठी पत्रही पाठविण्यात आले. तथापि, याबाबत अद्याप कोणताच निर्णय न झाल्याने जिल्हा परिषद सदस्य सचिन रोकडे यांनी कृषी विकास अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांना दखल घेण्याची मागणी केली. त्यानुसार मानोरा तालुक्यातील संबंधित शेतावर भेट देऊन पाहणी करण्यात येणार असून, आमचे अधिकारी ही कार्यवाही करतील, अस कृषी विभागाने सांगितले.पीक प्रात्यक्षिकासाठी पुरविलेले बियाणेही निकृष्टकृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियान २०१७-१८ अंतर्गत प्रात्यक्षिक या घटकांतर्गत महाबिजमार्फत सोयाबीनचे बियाणे प्रात्यक्षिकांतर्गत निवड केलेल्या वाशिम तालुक्यातील ब्राह्मणवाडा, पांगरखेडा, वाघोली, कोकलगाव, कारली, सोनखास, केकतउमरा या गावांतील २५ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते. या बियांण्यांचे उगवण कमी झाल्याचे उपरोक्त गावांतील शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार सदर समितीने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सदर बियाण्यांचे उगवण केवळ १५ ते २० टक्के झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले होते. या संदर्भातील अहवालही कृषी विभागाने पाठविला आहे.बियाणे उगविले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार आमच्या विभागाकडून पाहणी करून वरिष्ठांमार्फत महाबीजकडे अहवाल सादर केला आहे. याबाबत महाबीजने अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांचा मोबदला द्यायचा की शेत रिकामे राहिल्याची भरपाई द्यायची, हा निर्णयसुद्धा त्यांच्या अखत्यारीतील आहे. - नरेंद्र बारापत्रेकृषी विकास अधिकारी,