शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याची प्रतिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 14:12 IST

कृषी आयुक्तालयात पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतिक्षा कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी पीक विमाधारक शेतकऱ्यांना विमा मंजूर करण्यासाठी कृषी विभागामार्फत पंचनामे करून कृषी आयुक्तांकडे अहवाल पाठविला होता; परंतु कृषी आयुक्तालयात पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतिक्षा कायम आहे.राज्यात माहे आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या पीक नुकसानापोटी राज्य शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत करण्यासाठी दोन टप्प्यांत निधी वितरणास मंजुरी दिली आणि नुकसानग्रस्त शेतकºयांना शेतीपिकांसाठी हेक्टरी ८ हजार आणि फळबागांसार्ठी हेक्टरी १८ हजार रुपये प्रमाणे मदतीचे वितरणही करण्यात आले. तथापि, क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळेच नुकसान झालेल्या पीकविमाधारक शेतकºयांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. या शेतकºयांना पीकविम्याचा लाभ देण्यासाठी अ‍ॅग्रीकल्चर इन्शूरन्स कंपनी आॅफ इंडियाच्यावतीने निर्धारित निकषानुसार शेतकºयांच्या नुकसानाचा अहवाल मागविला, तसेच प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पिकांची छायाचित्रेही मागविली. यानुसार सर्व संबंधित कृषी अधिकाºयांमार्फत सर्वकश अहवालासह शेतकºयांच्या नुकसानाची छायाचित्रे कृषी आयुक्तालयाकडे पाठविली. आता या अहवालासह छायाचित्रांची पडताळणी कृषी आयुक्तांमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे अद्यापही पीकविमा कंपनीकडे अंतिम अहवाल पोहोचला नसल्याने शेतकºयांना पीकविम्याची प्रतिक्षाच आहे.

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमा