शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शिरपूर जैन तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जाची प्रतीक्षा; धार्मिक उत्सवांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:58 IST

शिरपूर जैन : जैनांची काशी मानल्या जाणार्‍या आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल पाच लाख भाविक येथे असतात. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी ‘क’ दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देण्याची गरज आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणीही केली आहे. 

ठळक मुद्देवर्षाकाठी पाच लाख भाविकांचे आवागमन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : जैनांची काशी मानल्या जाणार्‍या आणि विविध धार्मिक उत्सवांची वर्षभर रेलचेल असल्याने तब्बल पाच लाख भाविक येथे असतात. त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक असून, यासाठी ‘क’ दर्जात असलेल्या या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा देण्याची गरज आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे मागणीही केली आहे. शिरपूर जैन येथे जैन धर्मियांचे जगविख्यात अंतरिक्ष पार्श्‍वनाथ मंदिर आहे. या ठिकाणी विशेष उत्सवानिमित्त भाविकांची मांदियाळी असतेच, शिवाय दर्शनासाठी सतत येणार्‍या भाविकांची वर्षभरातील संख्या ही एक लाखापेक्षा अधिक आहे. त्याशिवाय येथे असलेल्या जानगीर महाराज संस्थानवर महाशिवरात्रीनिमित्त ७५ हजारांवर भाविक येतात. ओंकारगीर बाबा पुण्यतिथीला ५0 हजार भाविक, आषाढी उत्सवाला २५ हजारांवर भाविक येथे येतात. या ठिकाणी मुस्लीम धर्मियांचाही पवित्र मानला जाणारा मिर्झा मियॉ दर्गाह आहे. येथे उर्स उत्सवाला ६0 हजारांवर भाविक येतात. त्याशिवाय शिरपूर येथे विश्‍वकर्मा जयंती उत्सव मोठय़ा उल्हासात साजरा केला जातो. त्यासाठीही २0 हजार भाविक येथे येतात. बेलसरी महादेव येथील धार्मिक सोहळा, खंडोबा देवस्थानावरील धार्मिक सोहळा आणि नागनाथ देवस्थानावरील धार्मिक सोहळय़ासाठीही २५ हजारांवर भाविक या ठिकाणी येत असतात. उल्लेखनीय बाब अशी की, येत्या काही महिन्यांत या ठिकाणी भगवान अंतरिक्ष पार्श्‍वनाथांच्या मूर्तीची भव्य अशी प्रतीकृती पारसबाग परिसरात स्थापित करण्यात येणार आहे. तब्बल दोन हजार कारागीर ही मूर्ती घडविणार असून, ही मूर्ती घडविण्यासाठी तब्बल ९0 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर राजस्थानमधून येथे काळय़ा पाषाणाची भव्य शिळा आणली आहे. राज्यातील भगवान पार्श्‍वनाथांची ही एकमेव मूर्ती ठरणार असल्याने येथे देशभरातील जैन बांधव दर्शनासाठी येणार आहेत. 

शिरपूर जैन हे देशभर प्रसिद्ध असलेले सर्व धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. येथे वर्षाकाठी विविध धर्माचे चार लाखांवर भाविक दर्शनासाठी येतात. ही बाब लक्षात घेऊन या तीर्थक्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. येथील रस्ते रुंद, सुसज्ज असणे, पार्किंगसाठी भव्य असे मैदान असणे, भाविकांच्या वास्तव्याची सोय असणे गरजेचे आहे. यासाठी या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळावा, अशी मागणी आम्ही गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे करीत आहोत. ती मंजूर झाल्यास या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी मिळेल आणि भाविकांसाठी सुविधा उपलब्ध होतील. -शबानाबी मोहम्मद इमदाद, जिल्हा परिषद सदस्य, शिरपूर.  

टॅग्स :washimवाशिम