शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

१२३ गावांत पोषण अभियानाची शपथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 18:19 IST

वाशिम तालुक्यात ४ सप्टेंबर रोजी १२३ गावांत पोषण अभियानाचा जागर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्टÑीय पोषण महिना उपक्रमांतर्गत वाशिम तालुक्यात ४ सप्टेंबर रोजी १२३ गावांत पोषण अभियानाचा जागर केला. पोषण अभियानाची शपथ दिली असून, प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्यात आली.पोषण अभियानाच्या माध्यमातून नवजात बालकाच्या पहिल्या हजार दिवसात त्याचे पोषण व्यवस्थितरित्या होणे, स्वच्छता, अ‍ॅनेमिया, अतिसार या आजारांवर नियंत्रण मिळविणे, पौष्टीक आहार यासारख्या ५ महत्वपूर्ण घटकांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वाशिम तालुक्यात एकूण १२३ गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. गावोगावी सार्वत्रिक पोषण अभियानाची शपथ घेण्यात आली. पोषण अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी विभाग प्रमुखांना निर्देश दिले असून, त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत कार्यक्रम व उपक्रमांची रूपरेषा निश्चित केली. अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढण्यात आली. काटा येथे अंगणवाडीतील चिमुकली काव्या देशमुख हिच्या हस्ते या प्रभातफेरीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितिन मोहुर्ले, बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांच्यासह पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पोषण आहार, गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुलींना आरोग्य व पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ३० सप्टेंबरपर्यंत वाशिम तालुक्यामध्ये आरोग्य व पोषण बाबत जनजागृती व मार्गदर्शन केले जाणार आहे. पर्यवेक्षिका अमिता गिºहे, मीनाक्षी सुळे, बी. बी. वानखेडे यांच्यामार्फत ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर पोषण महिना राबविण्यात येत आहे, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम