शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

जलस्त्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी ग्रामस्थांची धडपड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 14:51 IST

कारंजा तालुक्यात बहुतांश गावात हे चित्र पाहायला मिळत असून, विविध प्रशासकीय विभागाकडून सुरू असलेल्या  कामांना ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

- प्रफुल बाणगावकर  कारंजा लाड (वाशिम) :  पाणीटंचाईच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना आता जलसंधारणाचे महत्त्व कळू लागले आहे. त्यामुळेच अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांची मोठी धडपड सुरू आहे. कारंजा तालुक्यात बहुतांश गावात हे चित्र पाहायला मिळत असून, विविध प्रशासकीय विभागाकडून सुरू असलेल्या  कामांना ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.कारंजा तालुक्यातील अनेक गावांत दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. त्यामुळे रोजगारांवर परिणाम होतोच शिवाय इतर कामांतही अडचणी निर्माण होतात. पाण्याअभावी गुरांचे पोषण करणे कठीण जाते. वणवण करूनही घशाची कोरड मिटविण्याइतपत पाणी मिळत नसल्याचे वास्तवही काही गावांत आहे. अशाच गावातील पाणीटंचाई मिटविण्यासाठी राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून कृषी विभाग, जि.प. लघू सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभागाच्यावतीने नाला खोलीकरण, शेततळे, ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, नदी खोलीकरण, तलाव खोलीकरणाची कामे करण्यात येत आहेत. यामुळे गावातील पाण्याची समस्या मिटण्यास मोठी मदत होणार असल्याने गावकरी या कामांसाठी प्रशासकीय विभागांना सहकार्य करत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात दिसूत असून, यामुळेच कारंजा तालुक्यात मोखड पिंप्री, हिंगणवाडीसह विविध गावांत जलस्त्रोतांच्या पुनरुज्जीवनाची कामे वेगात करण्यात येत असून, त्याचा फायदाही ग्रामस्थांसह शेतकºयांना होत आहे.    जलसंधारण विभागाची धडपड  पावसाळा सुरू झाला असून, ठिकठिकाणी जोरदार पाऊसही पडत आहे. यामुळे जलस्त्रोतांच्या खोलीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. पुढे पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर ही कामे करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे जलसंधारण विभाग त्यांच्या अखत्यारीत असलेली कामे पूर्ण करण्यासाठी मोठी धडपड करीत आहे. हिंगणवाडी ते रामटेक या नदीचे खोलीकरणही तातडीने पूर्ण व्हावे म्हणून जलसंधारण विभागाचे अधिकारी शक्य ते प्रयत्न करीत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.  हिंगणवाडी येथे नदी खोलीकरणभारतीय जैन संघटना व जलसंधारण विभागांच्या वतीने येथे सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील ग्राम रामटेक ते हिंगणवाडी राहटी नदीच्या खोलीकरणास १९ जुन पासून सुरवात झाली आहे. नदी खोलीकरणाच्या कामात हिंगणवाडी व राहटी तसेच रामटेक येथील शेतकरी वर्गासह ग्रामस्थांचे मोठया प्रमाणात सहकार्य मिळत जल संधारण विभागाला लाभत आहे. त्यामुळे ही नदी वेगाने गतवैभव प्राप्त करीत असल्याचे दिसते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा