शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

खंडीत वीज पुरवठ्याने ग्रामस्थ हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 16:33 IST

वाशिम: पावसाळ्याला आता कुठे सुरुवात झाली असतानाच वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार जिल्हाभरात घडत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: पावसाळ्याला आता कुठे सुरुवात झाली असतानाच वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार जिल्हाभरात घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले असून, पाणी पुरवठा योजना ठप्प होणे, पीठ गिरण्या बंद पडण्यासह विविध व्यवसायांवर याचा परिणाम होत आहे. शिवाय अपघाताची भितीही निर्माण झाली आहे. महावितरणच्यातीने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांत दिरंगाई केल्याने हा प्रकार घडत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.जिल्ह्यात वादळी वाºयामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडत असून, खंडीत झालेला पुरवठा तीन ते चार दिवस सुरळीतही होत नाही. मानोरा शहरासह तालुक्यात गुरुवार ६ रोजी सायंकाळी  विजेच्या कडकडासह वादळी वाºयाने हजेरी लावली त्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊसही  झाला. वादळी वाºयासह आलेल्या पावसाने मानोरा शहरासह तालुक्यातील काही गावांतील वीज पुरवळा खंडीत झाला. तो २२ तासापर्यंत सुरळीत झालाच नाही. मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी परिसरातील ६ गावे, तसेच मोहरी आणि शेलु परिसरातील काही गावांत रमजान ईदीच्या पूर्व संध्येला वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर तीन दिवस सुरळीत झाला नाही. रात्रंदिवस विजपुरवठा खंडीत राहत असल्यामुळे नागरिक उकाडयामुळे त्रस्त झाले आहेत. आबाल वृद्धांना त्याचा मोठा त्रास होत आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांवर त्यामुळे प्रभाव पडून ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पिठ गिरण्यासह इतर विजेवर चालणारे लघू व्यवसायही यामुळे अडचणीत येत आहेत.  महावितरणकडून वीज तारा, वीज खांब दुरुस्तीसह इतर कामांना वेग देणे आवश्यक झाल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.  चार गावांत पाच दिवसानंतर वीज पुरवठा मालेगाव तालुक्यातील धारपिंप्री, डोंगरकिन्ही, पांगरीकुटे, वडप, रेगाव या गावांत दिनांक ५ जून रोजी दुपार पासून वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे पाणी पुरवठा योजना प्रभावित झालीच शिवाय उकाड्यामुळ लहान मुले, वृद्धांचे मोठे हाल झाले. ग्रामस्थांनी महावितरणच्या अभियंत्यांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला; परंतु बहुतांश अधिकाºयांशी संपर्क झाला नाही आणि ज्यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी काम सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेली. प्रत्यक्षात ५ जून रोजी खंडीत झालेला वीज पुरवठा ९ जून रोजी सकाळीच सुरळीत झाला.  खंडीत वीज पुरवठ्याचा त्रास चिमुकल्यांना आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शेंदुरजना आढावसह परिसरातील गावांत तीन दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा योजना प्रभावित झाली असून, शेंदुरजना ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत शनिवार ९ जून रोजी सांयकाळपासून खंडीत झालेला वीज पुरवठा रविवारी वृत्त लिहिस्तोवरही पूर्ववत झाला नाही. एकाएकी खंडीत होणाºया वीज पुरवठ्यामुळे काही घरांतील वीज उपकरणे निकामी झाली, तर पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने महिला, पुरुषांसह चिमुकल्यांनाही शेतशिवारातून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण