शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

तेंदूपत्त्याने दिला मजुरांना रोजगार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:05 IST

तेंदूपत्ता तोडणीतून मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथे अनेक कुटुंबाला आधार मिळाला आहे.

- साहेबराव राठोडलोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार (वाशिम): वाशिम जिल्ह्यातील बहुतांश भागांत दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने शेतमजुरांच्या हाताला कामे मिळेनासी झाली आहेत. अशात वनपरिक्षेत्रातील तेंदूपत्ता तोडणीमुळे शेकडो मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याचे चित्र दिसत असून, तेंदूपत्ता तोडणीतून मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथे अनेक कुटुंबाला आधार मिळाला आहे.वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू अर्थात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली आहे. त्यामुळे खरीप हंगामानंतर जिल्ह्यातील शेतमजुरांना कामे मिळत नाहीत. परिणामी दरवर्षी खरीप हंगामानंतर हजारो मजूर रोजगारासाठी मुंबई, पुणे या मोठ्या शहरांसह गुजरात, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात स्थलांतर करतात. यंदाही जिल्ह्यातील हजारो शेतमजुरांनी रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर केले आहे. त्यातच यंदा जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत असतानाच शेतमजुरांच्या कुटूंबांवर उपासमारीची पाळी आली आहे.  अशा स्थितीत वनविभागाकडून तेंदूपत्त्याचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदारांचा अनेक कुटूंबाना आधार मिळाला आहे. सर्वसाधारण १०० पानांसाठी १८८ रुपये त्यांना  मोबदला मिळत आहे. जंगलात फिरुन तेंदू झाडांची पाने तोडायची एका ठिकाणी ही पाने प्रत्येकी पन्नास प्रमाणे एकास एक जोडायची आणि दोन्ही मिळून उलटी सरकी जोडणी करून एक पुडा तयार करायचा, असा या कामाचा प्रकार आहे. कामगार जेवढी पाने तोडतील. तेवढा मोबदला त्यांना मिळतो. त्याशिवाय शासनाकडून या कामांना बोनसही दिला जातो. त्यामुळे या व्यवसायातून जिल्ह्यातील शेकडो कु टुंबाचे उदरभरण होत असल्याचे दिसत आहे. यात मंगरुळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथील ३० ते ३५ परिवारांतील कामगारांचाही समावेश असून, सकाळी ३ ते ४ वाजता हे कामगार जंगलात जाऊन तेंदूपत्ता तोडून आणतात आणि त्यानंतर सकाळी १० वाजतापासून घरी संपूर्ण परिवार पानांचे पुडे तयार करीत बसतात.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर